शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

सांस्कृतिक लढाईच्या आडून सुविधांवर आक्रमण

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे,

अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी शुक्रवारी येथे केले. ज्येष्ठ लेखक व विचारवंत दत्ता देसाई यांना कॉ.गोविंद पानसरे प्रबोधिनी पुरस्कार डॉ.साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, अरुण कडू यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. साळुंखे म्हणाले की, या पुरस्कारामुळे कॉ.पानसरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम घडत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार निमित्त आहे त्यांचा विचार चिरंतन राहावा व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा खरा उद्देश आहे. पानसरे राज्यकर्त्यांविरुद्ध लढत होते तरी दुबळ्यांसाठी त्यांचे काळीज तडफडत होते. पानसरेंसारखे लोक नेहमी लढत असतात. चाकोरीबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार पानसरे यांनी समाजासमोर मांडला असे सांगून ते म्हणाले की, धार्मिक तणाव-जातीय तेढ संघर्षाने सुटणार नाही त्यासाठी संवादाचा मार्ग उत्तम आहे. शोषितांच्या चळवळी प्राचीन काळापासून सुरु आहेत़ चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी मात्र, आजही कॉ़ पानसरेंसारख्या समाजसेवकांना प्राण गमवावा लागत आहे़ ज्यांना प्रस्थापित समाज व्यवस्था टिकवायची ते त्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात़ परंतु,जे शोषितांच्या चळवळी चालवत आहेत तेही चळवळी पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास कमी पडले ही मोठी उणीव सांस्कृतिक संघर्षात राहून गेली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली़ यावेळी दत्ता देसाई म्हणाले की,जे लोक राष्ट्रवादाचा आशय नव्याने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. आता केवळ बचावात्मक पवित्रा घेऊन चालणार नाही तर नवा राष्ट्रवाद , नवी धर्मनिरपेक्षता पुढे न्यायची आहे ती जबाबदारी या पुरस्कारामुळे मला मिळाली आहे. यावेळी अरुण कडू यांचे भाषण झाले. प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांनी प्रास्ताविक केले. कॉ. बन्सी सातपुते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)