शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

सांस्कृतिक लढाईच्या आडून सुविधांवर आक्रमण

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे,

अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी शुक्रवारी येथे केले. ज्येष्ठ लेखक व विचारवंत दत्ता देसाई यांना कॉ.गोविंद पानसरे प्रबोधिनी पुरस्कार डॉ.साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, अरुण कडू यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. साळुंखे म्हणाले की, या पुरस्कारामुळे कॉ.पानसरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम घडत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार निमित्त आहे त्यांचा विचार चिरंतन राहावा व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा खरा उद्देश आहे. पानसरे राज्यकर्त्यांविरुद्ध लढत होते तरी दुबळ्यांसाठी त्यांचे काळीज तडफडत होते. पानसरेंसारखे लोक नेहमी लढत असतात. चाकोरीबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार पानसरे यांनी समाजासमोर मांडला असे सांगून ते म्हणाले की, धार्मिक तणाव-जातीय तेढ संघर्षाने सुटणार नाही त्यासाठी संवादाचा मार्ग उत्तम आहे. शोषितांच्या चळवळी प्राचीन काळापासून सुरु आहेत़ चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी मात्र, आजही कॉ़ पानसरेंसारख्या समाजसेवकांना प्राण गमवावा लागत आहे़ ज्यांना प्रस्थापित समाज व्यवस्था टिकवायची ते त्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात़ परंतु,जे शोषितांच्या चळवळी चालवत आहेत तेही चळवळी पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास कमी पडले ही मोठी उणीव सांस्कृतिक संघर्षात राहून गेली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली़ यावेळी दत्ता देसाई म्हणाले की,जे लोक राष्ट्रवादाचा आशय नव्याने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. आता केवळ बचावात्मक पवित्रा घेऊन चालणार नाही तर नवा राष्ट्रवाद , नवी धर्मनिरपेक्षता पुढे न्यायची आहे ती जबाबदारी या पुरस्कारामुळे मला मिळाली आहे. यावेळी अरुण कडू यांचे भाषण झाले. प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांनी प्रास्ताविक केले. कॉ. बन्सी सातपुते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)