शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आश्रमशाळांची गाडी येतेय रुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील आश्रमशाळा हळूहळू सुरू होत आहेत. नववी ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील आश्रमशाळा हळूहळू सुरू होत आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृहांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने वसतिगृहे प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने पाऊल उचलले असून, २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील प्रारंभी कमी असलेली उपस्थिती आता हळूहळू वाढत आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आश्रमशाळा किंवा वसतिगृहात राहतात; परंतु ही वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याणचे १०३, तर शासकीय १८ असे एकूण १२१ वसतिगृह जिल्ह्यात असून त्यात ४६१० विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे हे सर्व वसतिगृह बंद होते; परंतु आता हे सुरू करण्याच्या सूचना समाजकल्याणने दिल्या आहेत.

याशिवाय समाजकल्याणच्या ४, खासगी अनुदानित ४३, खासगी विना अनुदानित १३, आदिवासी (शासकीय) २२, आदिवासी (खासगी) २८ अशा एकूण ११० आश्रमशाळा जिल्ह्यात असून, त्यात एकूण १९ हजार ६७९ विद्यार्थी आहेत. यातील १८ शासकीय व २ खासगी अशा २० आश्रमशाळा सध्या सुरू झाल्या असून, त्यात ४०५ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

-----------------

जिल्ह्यातील आश्रमशाळा - ११०

सुरू झालेल्या आश्रमशाळा - २०

एकूण विद्यार्थी - १९६७९

उपस्थित विद्यार्थी - ४०५

-------------------------

जिल्ह्यातील वसतिगृह - १२१

सुरू झालेले वसतिगृह - ०

एकूण विद्यार्थी - ४६१०

उपस्थित विद्यार्थी - ०

-------------------------

आश्रमशाळांपुढील अडचणी

आश्रमशाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत; मात्र अनेक पालक संमतीपत्र भरून देत नसल्याने उपस्थिती कमी आहे. शिवाय काही ठिकाणी शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे आश्रमशाळा सुरू करण्यात काहीशा अडचणी येत आहेत.

----------------

वसतिगृहांपुढील अडचणी

शासकीय १८ वसतिगृहांपैकी १० वसतिगृह कोविड सेंटर म्हणून जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेची वसतिगृहे सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागणार आहे.

---------------

आतापर्यंत २० आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या संमतीपत्राचे प्रमाण कमी आहे. शिवाय काही शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत; परंतु यातूनही मार्ग काढून आश्रमशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.

- संतोष ठुबे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर.