शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कपाटात ठेवलेले दागिने, पैसे सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:34 IST

दिवाळी सणात नागरिक घर बंद करून गावाकडे, नातेवाइकांकडे जातात. त्यामुळे चोरट्यांसाठी हा सुगीचा काळ असतो.

अहमदनगर : दिवाळीत नागरिक नातेवाईक, मित्रांच्या भेटीसाठी बाहेरगावी जात असतात. दिवाळीच्या काळात बंद असलेल्या घरांना लक्ष्य करीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम, वाहने लंपास करून दिवाळी साजरी केली आहे.

दिवाळी सणात नागरिक घर बंद करून गावाकडे, नातेवाइकांकडे जातात. त्यामुळे चोरट्यांसाठी हा सुगीचा काळ असतो. बस स्थानकांत होणारी गर्दी, बंद घरे हेरून चोरटे हात साफ करण्याची संधी सोडत नाहीत. प्रवासात दागिने चोरीच्या घटनांसह वाहने, कपाटातील दागिने चोरीच्या घटना दिवाळीच्या काळात घडल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा धुडगूस असतो. त्यामुळे पोलिसांनी दिवाळीपूर्वीच आवाहन केले होते. 

याशिवाय, शहरासह ग्रामीण भागातील गस्तही वाढविण्यात आली होती. मात्र, नागरिकांसह पोलिसांनाही चकवा देत चोरट्यांनी मौल्यवान दागिने, मोटारसायकली, रोख रक्कम लंपास केली. अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. अशा बंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लांबविली असून, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नाही. त्यामुळे एकदा चोरीला गेलेला माल परत मिळत नाही. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.

नवीन मोटारसायकली लांबविल्यादिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी मोटारसायकलसह अन्य वस्तूंची खरेदी केली. या मोटारसायकलीही चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना दिवाळीच्या काळात घडल्या. वाहन चोरीचे प्रमाण दिवाळीनंतर वाढले असून, चोरी रोखण्याचे आवाहन पोलीस दलासमोर आहे.

आठवडाभरात ८० हून अधिक चोरीच्या घटनादिवाळीच्या काळात शहरासह जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात ८०हून अधिक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी बंद असलेली घरे, दुकाने फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

धान्याचा ट्रक पळविलादिवाळीच्या काळात नगर - औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाटात नगरकडे येत असलेल्या धान्याचा ट्रक चोरट्यांनी चालकाला दमदाटी करत पळवून नेला. हा ट्रक चोरट्यांनी नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात सोडून ते पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसानिहाय लंपास मुद्देमाल२३ ऑक्टोबर, घटना - ९, ५ लाख२५ ऑक्टोबर, घटना - १३, ४ लाख ५० हजार२६ ऑक्टोबर, घटना - १०, ७ लाख२७ ऑक्टोबर, घटना - १६, ९ लाख ५५ हजार२८ ऑक्टोबर, घटना - १५, १२ लाख ४५ हजार२९ ऑक्टोबर, घटना - १३, १० लाख ३५ हजार३० ऑक्टोबर घटना - २१, १० लाख २२ हजार

ऐन दिवाळीत एसपी बदलले, चोरट्यांनी साधला डावदिवाळीत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बदलले. ऐन दिवाळीत जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस दलात अचानक झालेल्या बदलामुळे अधिकारी व कर्मचारीही व्यस्त होते. ही संधी साधत चोरट्यांनी डाव साधला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी