शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

साथरोग नियंत्रण कृती आराखडा लागू

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, पूरग्रस्त गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरजिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, पूरग्रस्त गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्यात २४ तास साथ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यात २२३ गावे पूरग्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी पी.बी. गंडाळ यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, जिल्ह्यात प्रवरा, म्हाळुंगी, घोड, भिमा, गोदावरी, मुळा आणि कुकडी या नदी काठावरील २२३ पूरग्रस्त गावांसाठी ९६ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार केलेली आहेत. जिल्हास्तरावर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके असून तीन नोडल अधिकाऱ्यांची नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यात २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी जिल्ह्यासाठी तातडीची १२ पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच आपत्ती जोखीम व्यवस्थापनाचे तालुकानिहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, २३ ग्रामीण रुग्णालय, ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५५५ उपकेंद्र आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावयासाठी तालुकानिहाय कार्यवाही करण्यात आलेली आहे. अशुध्द पाण्याचा पुरवठा झाल्यास कोणाला जबाबदार धरण्यात यावे, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सातत्याने कावीळ, अतिसार, ग्रॅस्टो, कॉलेरा, डेंग्यू, हिवताप, गोवर आदी आजारांचा उद्रेक झालेल्या गावांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर यंदा लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नदी काठावर असणारी गावे१) प्रवरा नदी : संगमनेर-१७, श्रीरामपूर- १९ आणि अकोले २४, राहाता ७, राहुरी-२५, नेवासा १२ गावे२) घोड-भिमा आणि सीना नदी : श्रीगोंदा-१४, कर्जत-१२, जामखेड-३ गावे, म्हाळुंगी, संगमनेर ४ गावे.३) गोदावरी नदी : श्रीरामपूर -१२, कोपरगाव- २०, शेवगाव १, नेवासा ५ गावे, ४) मुळा नदी : नेवासा ६ गावे.५) कुकडी- घोड नदी : पारनेर - ६, सीना-९ गावे. ४या गावांसाठी ९६ आरोेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.कर्मचाऱ्यांचा रजा बंद1जिल्हास्तरावर साथरोग्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात १२ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हा कक्ष आॅक्टोबर महिन्यांपर्यंत कार्यरत राहणार आहे. याकाळात संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा थांबविण्यात आलेल्या आहेत.2प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत राहणार आहे. जून महिन्यांत जलजन्य आजारांविरोधात जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका यांना क्षार संजीवनी वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.3जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सुमारे १०० गावांत साथजन्य आजारांचा उद्रेक झालेला आहे. या गावांची तालुकानिहाय यादी तयार करण्यात आली असून त्या गावांवर यंदा लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी यंदा कोणत्याच साथजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.4जिल्ह्यात १४ तालुक्यात ६२ लहान मोठे धार्मिक क्षेत्र, यात्रांची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी या वर्षी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी साथीचे आजार निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेण्यात येणार आहेत.5जिल्ह्यात २२३ पूरग्रस्त गावे आहेत. यात नगर ९, अकोले २५, संगमनेर १७, राहाता ५, श्रीगोंदा १४, श्रीरामपुर २७, राहुरी ३९, नेवासा २६, कर्जत २२, जामखेड ३, कोपरगाव २२, पारनेर १४ यांचा समावेश आहे.