शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

दोषमुक्ततेसाठी आरोपींचा अर्ज

By admin | Updated: April 25, 2016 23:22 IST

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालायाकडे सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे.

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालायाकडे सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, तिघा आरोपींवर दोष निश्चिती करण्यात यावी, याबाबतचे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाले. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडातील नियमित सुनावणी प्रक्रिया प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर सोमवार (दि. २५) पासून सुरू झाली. या हत्याकांडातील आरोपी प्रशांत जाधव, अशोक जाधव आणि दिलीप जाधव यांच्यावरील आरोप निश्चित करण्यासाठी सोमवारी सुनावणी झाली. या खटल्यात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी आरोपींविरुद्ध पुराव्यांची मालिकाच सादर केली. त्यामुळे आरोपींवर दोष निश्चित करून नियमित सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज दिला. त्यावर आता शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आरोपींनी यापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे.(प्रतिनिधी)