शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अण्णा म्हणतात, मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही; २३ मार्चपासून दिली आंदोलनाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:39 IST

मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालची नियुक्ती होऊ शकती नाही असे केंद्र शासनाचे म्हणणे चुकीचे असून मग भाजपाशासित राज्यांमध्ये तरी लोकायुक्त का नेमले नाहीत असा प्रश्न हजारे यांनी केला आहे.गुजरातचे मुख्यमंत्री असतानासुध्दा आपण लोकायुक्त नेमला नव्हता. त्यावेळी राज्यपालांनी लोकपालची नेमणूक केल्यावर तुम्ही त्या विरोधात न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथेही लोकायुक्त निवडीचे आदेश दिले होेते, अशी आठवण अण्णांनी मोदींना करून दिली.मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे.

पारनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी लोकपाल व लोकायुक्तचे अधिकार कमी करण्यासाठी नियम ४४ मध्ये बदल करून घेतले. त्यामुळे मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे.लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना अनेकवेळा पत्र लिहून आठवण करून दिली होती. मात्र तीन वर्षानंतरही केंद्राने याची दखल घेतली नाही म्हणून अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालची नियुक्ती होऊ शकती नाही असे केंद्र शासनाचे म्हणणे चुकीचे असून मग भाजपाशासित राज्यांमध्ये तरी लोकायुक्त का नेमले नाहीत असा प्रश्न हजारे यांनी केला आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असतानासुध्दा आपण लोकायुक्त नेमला नव्हता. त्यावेळी राज्यपालांनी लोकपालची नेमणूक केल्यावर तुम्ही त्या विरोधात न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथेही लोकायुक्त निवडीचे आदेश दिले होेते. परंतु त्यावेळी आपण नऊ वर्षे लोकयुक्त नेमला नाही व आता तीन वर्षे केंद्रात आपले सरकार असूनही लोकपाल व लोकायुक्त नेमला नाही. याच्यातूनच आपल्या बोलण्यात आणि काम करण्यात खूप फरक असल्याचे दिसून येत असल्याचा टोला अण्णांनी लगावला आहे.

लोकपाल कायद्यात हे केले बदल

लोकपाल व लोकायुक्तचे अधिकार कमी करण्यासाठी नियम ४४ मध्ये बदल करण्यासाठी २६ जुलै २०१६ मध्ये तीन दिवसात संसदेत मंजूर करून घेतले. नियम ४४ मध्ये संसद सदस्य, अधिकारी यांचे स्वत:चे, पत्नी, मुले यांची संपत्तीची माहिती दरवर्षी देणे बंधनकारक होते. तेच आपण रद्द करून टाकले याचा अर्थ तुम्हाला देशातील भ्रष्टाचाराला आळा घालायचा नाही, हे दिसून येते असे अण्णांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे