शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अण्णा म्हणतात, मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही; २३ मार्चपासून दिली आंदोलनाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:39 IST

मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालची नियुक्ती होऊ शकती नाही असे केंद्र शासनाचे म्हणणे चुकीचे असून मग भाजपाशासित राज्यांमध्ये तरी लोकायुक्त का नेमले नाहीत असा प्रश्न हजारे यांनी केला आहे.गुजरातचे मुख्यमंत्री असतानासुध्दा आपण लोकायुक्त नेमला नव्हता. त्यावेळी राज्यपालांनी लोकपालची नेमणूक केल्यावर तुम्ही त्या विरोधात न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथेही लोकायुक्त निवडीचे आदेश दिले होेते, अशी आठवण अण्णांनी मोदींना करून दिली.मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे.

पारनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी लोकपाल व लोकायुक्तचे अधिकार कमी करण्यासाठी नियम ४४ मध्ये बदल करून घेतले. त्यामुळे मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे.लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना अनेकवेळा पत्र लिहून आठवण करून दिली होती. मात्र तीन वर्षानंतरही केंद्राने याची दखल घेतली नाही म्हणून अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालची नियुक्ती होऊ शकती नाही असे केंद्र शासनाचे म्हणणे चुकीचे असून मग भाजपाशासित राज्यांमध्ये तरी लोकायुक्त का नेमले नाहीत असा प्रश्न हजारे यांनी केला आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असतानासुध्दा आपण लोकायुक्त नेमला नव्हता. त्यावेळी राज्यपालांनी लोकपालची नेमणूक केल्यावर तुम्ही त्या विरोधात न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथेही लोकायुक्त निवडीचे आदेश दिले होेते. परंतु त्यावेळी आपण नऊ वर्षे लोकयुक्त नेमला नाही व आता तीन वर्षे केंद्रात आपले सरकार असूनही लोकपाल व लोकायुक्त नेमला नाही. याच्यातूनच आपल्या बोलण्यात आणि काम करण्यात खूप फरक असल्याचे दिसून येत असल्याचा टोला अण्णांनी लगावला आहे.

लोकपाल कायद्यात हे केले बदल

लोकपाल व लोकायुक्तचे अधिकार कमी करण्यासाठी नियम ४४ मध्ये बदल करण्यासाठी २६ जुलै २०१६ मध्ये तीन दिवसात संसदेत मंजूर करून घेतले. नियम ४४ मध्ये संसद सदस्य, अधिकारी यांचे स्वत:चे, पत्नी, मुले यांची संपत्तीची माहिती दरवर्षी देणे बंधनकारक होते. तेच आपण रद्द करून टाकले याचा अर्थ तुम्हाला देशातील भ्रष्टाचाराला आळा घालायचा नाही, हे दिसून येते असे अण्णांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे