शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अनिल राठोड यांनी पदोपदी निष्ठा विकली : अंबादास पंधाडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:07 IST

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी हिंदुत्त्वाचा फक्त मुखवटा लावला. मात्र आतमध्ये फक्त तडजोडीचे राजकारण करून स्वत:च्या निष्ठा विकल्या.

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी हिंदुत्त्वाचा फक्त मुखवटा लावला. मात्र आतमध्ये फक्त तडजोडीचे राजकारण करून स्वत:च्या निष्ठा विकल्या. राठोड यांच्यामुळेच अरुण जगताप विधानपरिषदेवर निवडून गेले, तर संग्राम जगतापही पहिल्यांदा महापौर झाले. जगताप यांना राठोड यांनीच मोठे केले. छगन भुजबळांसोबत शिवसेना फुटल्यानंतर दुसऱ्या सहा फुटीर आमदारांमध्ये अनिल राठोड हे एक होते. त्यामुळे राठोड हेच खरे गद्दार आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबादास पंधाडे यांनी ‘लोकमत’कडे केला.शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत फेसबुक पेजवर गुरुवारी लाईव्ह मुलाखत झाली. ती मुलाखत शुक्रवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखती दरम्यान राठोड यांनी पंधाडे यांचा उल्लेख निष्ठावान कसले ते गद्दार आहेत. तसेच गरजा भागविण्यासाठी ते दुसरीकडे गेले, असा आरोप केला. या आरोपाचे पंधाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’कडे खंडण केले.पंधाडे म्हणाले, नागपूर अधिवेशनादरम्यान छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली. सेनेचे १८ आमदार भुजबळांसमवेत गेले. आणखी सहा आमदारांनीही भुजबळ यांच्यासोबत जाण्यासाठी तडजोडी केल्या. त्यामध्ये राठोड हे एक होते. मात्र ही बातमी फुटल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सहा आमदारांना मातोश्रीवर बोलावून तंबी दिली. मात्र राठोड गद्दार निघाल्याने १९९६ मध्ये त्यांना सुरवातीला विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्याऐवजी गोपाळराव झोडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. झोडगे हे त्यावेळी काँग्रेसचे होते. तसेच त्यांचे भुजबळांशी संबंध असल्याचे पुरावे ठाकरे यांना दिले. राठोड हे एकही पैसा न खाता काम करणारा, चांगला जनसंपर्क असणारा आमदार होता. त्यामुळे राठोड यांनाच उमेदवारी देण्यासाठी ठाकरे यांच्याकडे शिष्टाई केली. ठाकरे यांनी मलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र ती नम्रपणे नाकारली आणि राठोड यांच्यासाठीच उमेदवारी मागितली. निष्ठावान नसतो तर हे माझ्याकडून घडले असता का? राठोड यांनी सेनेशी गद्दारी केल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता, हेच खरे सत्य आहे.पंधाडे म्हणाले, निष्ठावान असल्यानेच शिवसेनेत २५ ते ३० वर्षे टिकलो. मला कोणीही शिवसेनेतून काढलेले नाही आणि मी ही शिवसेना सोडलेली नाही. कोणत्याही पक्षातही प्रवेश केला नाही. फक्त राजकारणात आता सक्रिय नाही. २००८ मध्ये महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली. सेनेकडे बहुमतही होते. मात्र दोन कोटी असतील तरच महापौर होता येईल,असे ते म्हणाले. सेनेशी २५ वर्षांपासून निष्ठा असणाºयांची राठोड यांनी अशी किंमत केली. त्यामुळेच त्यांची साथ सोडून दिली, मात्र शिवसेना सोडलेली नाही. त्यावेळी राठोड यांनीच काहींना राष्ट्रवादीत पाठविले, त्यामुळे संग्राम जगताप महापौर झाले. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचा पराभव झाला. सेनेशी १८ नगरसेवकांनी मतदान केल्यामुळेच जगताप आमदार झाले. त्यामुळे राठोड निष्ठावान की गद्दार ? हे सांगायची गरज नाही. अरुण जगताप यांना नगराध्यक्ष करण्यातही राठोड यांचाच सिंहाचा वाटा होता. राठोड हे ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ बादशहा आहेत.आमदार निधीही विकलाराठोड यांनी कोतकर, कर्डिले, जगताप यांच्यावर वैयक्तिक टीका कधीच केली नाही. तेवढी धमकही त्यांच्यात नव्हती. ते केवळ राजकीय टीका करायचे. माझ्याकडे निष्ठा नव्हती तर २५ वर्षे जवळ का केले? राठोड यांचा व्यवसाय काय? त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालतो? हे त्यांनी सांगावे. राठोड यांनी १५ टक्क्यांनी आमदार निधीही विकला, असाही आरोप पंधाडे यांनी केला. त्याशिवाय त्यांचा चरितार्थ चालणेच शक्य नाही. राजकारण हाच त्यांचा खरा धंदा आहे. कार्यकर्त्यांना मोठे होऊ न देणे आणि नव्यांना झुलवत ठेवणे, खोटे बोलणे यात राठोड पटाईत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका