शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:19 IST

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर:  महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावे सुचविण्याचा आज (३० सप्टेंबर) अखेरचा दिवस आहे. शिवसेनेकडून मदन आढाव संग्राम शेळके या दोघांची नावे यापूर्वी झालेल्या बैठकीतच  सुचविण्यात आली होती. दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव विक्रम यांना संधी द्यावी अशी पक्षातून मागणी पुढे आली होती. 

याबाबत स्थानिक पदाधिका-यांनी विक्रम राठोड यांच्याशी चर्चाही केली. परंतु वडिलांनी मदन आढाव यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे हा शब्द पक्षाने कायम ठेवावा. आढाव यांना संधी द्यावी, अशी भूमिका विक्रम राठोड यांनी मांडली असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

स्व. अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  अशावेळी अनेक इच्छुकांनी डोके वर काढले होते. मात्र विक्रम राठोड यांनी मनाचा मोठेपणा दाखवत वडिलांचा शब्द मोठा असून कार्यकर्त्यांनीही या शब्दाचा आदर ठेवून या दोघांना संधी देण्यास संमती दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाAnil Rathodअनिल राठोडPoliticsराजकारण