शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

संतप्त शेतकऱ्यांचा राशीनच्या वीज वितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:20 IST

राशीन : कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या तीन गावांच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने ...

राशीन : कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या तीन गावांच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी राशीन वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे व प्रश्नांची सरबत्ती करीत येत्या तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, रोज तीन ते चार तास वीज सुरू असते. त्यामध्येही सतत अर्ध्या, एक तासाला वीज बंद केली जाते. त्यामुळे पूर्ण दाबाने व क्षमतेने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यात आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ठराविक शेतकरीच विहिरीवर व शेतळ्यावर अवलंबून असतात. त्यांनाही पाणी असून, विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होते. पिके जळण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी राशीन येथील वीज वितरण कार्यालयावर सकाळी अकरा वाजल्यापासून बसले होते; परंतु शाखा अभियंता नसल्यामुळे राशीन दूर क्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिरसाट व पोलीस कॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते यांनी मध्यस्थी करीत सहायक अभियंता संदीप जाधव यांच्याशी संवाद साधून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी भुजंग कदम, शहाजी कदम, दत्ता ढगे, अतुल सौताडे, नवनाथ काळे, विकास थोरात, मनोहर ढगे, भाऊ निंभोरे, भाऊ राऊत, भरत कदम, शशिकांत लेणे, सद्दाम काझी, रौफ काझी, नीलेश केदारी आदी उपस्थित होते.

०५ : तळवडी, बारडगाव व येसवडी गावचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी शाखा अभियंत्याला घेराव घातला.