शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डिजिटल शाळांमध्ये अहमदनगर अव्वल, शिक्षकही तंत्रस्नेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:10 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रम राबविला जात असून याअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा उल्लेख प्रगतच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे माहेरघर आणि ह्यआयटी हबह्ण अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे पडले आहे तर अहमदनगरने अव्वल स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्देराज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब असलेल्या शाळांची संख्या केवळ ४८७एकही संगणक चालू नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या तब्बल ३७ हजार!आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात राज्यातील शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद

राहुल शिंदेपुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रम राबविला जात असून याअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा उल्लेख प्रगतच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे माहेरघर आणि ह्यआयटी हबह्ण अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे पडले आहे तर अहमदनगरने अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब असलेल्या शाळांची संख्या केवळ ४८७ आहे. तर एकही संगणक चालू नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या तब्बल ३७ हजार आहे.राज्यात डिजिटल शाळा तयार करण्याची एक लाट तयार झाली. काही शिक्षकांनी लोकसहभागातून डिजिटल शाळा तयार करण्याचे काम हाती घेतले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंंतर्गत निधी उभा राहत आहे. त्यामुळे शासनाने राज्यनिधीला लोकसहभागाची जोड देऊन राज्यातील सर्व शाळा येत्या २-३ वर्षांत डिजिटल करण्याबाबत योजना तयार करण्याचे निश्चित केले. तसेच डिजिटल शाळांची चळवळ उभी राहावी, या उद्देशाने शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी टॅबलेट उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यादेशातून जाहीर केले. राज्यातील केवळ ६१ हजार शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या असून सुमारे १ लाखाहून अधिक प्राथमिक शाळांना डिजिटल करण्याचे मोठे आवाहन शासनासमोर आहे. त्यातही चार विद्यार्थ्यांमागे १ टॅब असणा-या शाळांची संख्या १७६ आहे. तसेच ५ पेक्षा अधिक संगणक असलेल्या शाळांची संख्या ५ हजार ९८८ असून ५ हजार ८४४ शाळांमध्ये ३ ते ५ संगणक आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील १८ हजार २०१ शाळांमध्ये एक किंवा दोन संगणक आहेत. तर राज्यातील शाळांमध्ये वापरात असलेल्या संगणकांची संख्या ३० हजार आहे. शासनाकडून डिजिटल शाळांच्या निर्मितीबाबत प्रयत्न केले जात असले तरी त्यास गती देण्याची आवश्यकता असल्याचे शाळांमधील संगणकांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात राज्यातील शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी राज्यातील तब्बल १ लाख ६० हजार शिक्षकांनी नोंदणी केली. त्यातील १ लाख ७ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील डिजिटल शाळांची आकडेवारी

अहमदनगर ५,२२३कोल्हापूर २,८३३पुणे १,८६९रत्नागिरी १,९०७सांगली १,७६४सातारा १,८९८सिंधुदुर्ग १,३३२सोलापूर १,७०४

तंत्रस्नेही शिक्षकांच्या संख्येत वाढ

दिवसेंदिवस तंत्रस्नेही शिक्षकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसे शिक्षण देता येईल. त्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा, त्यासाठी शिक्षकांकडून अ‍ॅप्स, व्हिडीओ, वेबसाईट व ब्लॉग्ज तयार केले जात आहेत. आतापर्यंत शिक्षकांनी ४ हजार १८ अ‍ॅप्स, ४८ हजार ६४५ व्हिडीओ आणि ५ हजार ९८७ वेबसाईट तयार केल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा