शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहमदनगर मनपा : सभापती निवडी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:38 IST

महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे.

अहमदनगर : महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे. पैसे खर्च करून सभापतीपदे मिळविली तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणतीही विकास कामे करता येणार नाहीत. याच धास्तीने सध्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आतूर झालेले इच्छुक थंडावले आहेत. सभापतीपदाच्या निवडीची काही घाई नाही, असेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवड झाली. त्यानंतर एक महिन्याच्या आत स्वीकृत सदस्य नियुक्त होणे आवश्यक असते. मात्र बहुजन समाज पक्षाने दुसऱ्यांदा गटनोंदणीचा प्रस्ताव दाखल केला. त्यावर विभागीय आयुक्तांनी अद्याप निर्णय दिला नाही. मात्र या घोळामुळे स्वीकृत, स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापालिकेची विशेष सभा लांबणीवर पडली आहे. आधी स्थायी समितीचे सदस्य नियुक्त होणे आवश्यक आहे. सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. मात्र सदस्यांच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याने सभापती निवडही सध्या तरी होणे शक्य नाही. दरम्यान सदस्य नियुक्तीसाठी नगरसचिव कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्याला अद्याप महापौरांनी हिरवा कंदिल दाखविला नाही. नियमानुसार गटनोंदणी एकदाच होते. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार सदस्य नियुक्ती होऊ शकतो. मात्र बसपाने नव्याने दाखल केलेला प्रस्ताव भाजपच्या पथ्यावर पडला आहे. विशेष सभा बोलविण्याची घाई नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. शक्य झाले तर फेब्रुवारीतच स्थायी समिती सदस्य नियुक्ती होऊ शकते. सभापती निवड झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सभापती पद घेऊन काय करणार? अशा चर्चा महापालिका वर्तुळात आहेत. आचारसंहितेच्या धास्तीनेच इच्छुकांनीही सध्या तलवार म्यान केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका