शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अहमदनगर महापालिकेसमोर महिलांनी फोडले माठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:54 IST

भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले.

ठळक मुद्देभिस्तबाग महाल परिसरात पाणी टंचाईराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे आंदोलन

अहमदनगर : भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप हेही सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन तास चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापालिकेवर मोर्चा आणला. या मोर्चात आ. संग्राम जगताप हेही सहभागी झाले आणि त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. आंदोलनातील महिलांनी महापालिकेच्या प्रांगणात दहा ते बारा माठ फोडून महापालिकेचा निषेध केला. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला.भिस्तबाग महाल रोड आणि तपोवन रोड परिसरातील नंदनवन नगर, पवन नगर, गोकुळ नगर, साईराम नगर, तुळजा नगर, जय भवानी नगर, दत्त नगर, तपोवन रोड परिसर, भिस्तबाग महाल रोड परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये रात्री वेळी-अवेळी पाणी पुरवठा होतो. तो कमी दाबाने असल्याने परिसरात पाणी टंचाई झाली आहे. संपूर्ण भागाला सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी भिस्तबाग चौकातील मुख्य जलवाहिनीवरून सध्या अस्तित्त्वात असलेली जलवाहिनी जोडण्यात यावी. त्यामुळे संपूर्ण भागाला वेळेवर आणि समान पाणी पुरवठा करता येणार आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने ठिय्या देण्याचा निर्णय प्रभागातील नागरिकांनी घेतल्याचे संपत बारस्कर यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, अमित खामकर, गुड्डू खताळ, सचिन लोटके, साधना बोरुडे, आदी सहभागी झाले होते.अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आठ दिवसांमध्ये २४ इंची मुख्य जलवाहिनीवरून अस्तित्त्वात असलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडून देण्यात येईल. तसेच कॉटेज कॉर्नर, डॉन बॉस्को, सुमन कॉलनी, सागर विहार या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच या भागासाठी स्वतंत्र व्हॉल्व्हमन देण्यात येईल, असे आश्वासन वालगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगताप