शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:40 IST

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली.

ठळक मुद्दे९ हजार कामे पूर्ण : शेतकऱ्यांना ४५ कोटींचा हातभार, १८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. त्यात मे २०१८ अखेर अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापोटी शेतकºयांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे ४५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. या योजनेतून १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये ‘मागेल त्याला शेतततळे’ ही योजना आणली.जिल्हा, लक्षांक,पूर्ण कामेअहमदनगर ९२००, ९१००औरंगाबाद ९१००, ६९२०नाशिक ९०००, ६१०३सोलापूर ८०००, ४७६८बीड ६५००, ५०४३जालना ६०००, ५६५६बुलढाणा ५०००, ३६५१लातूर ४८००, १६२७सांगली ४५००, ३६४३अमरावती ४५००, ३२४८यवतमाळ ४५००, ५०९०नांदेड ४०००, १४८

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला.दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.कामे झालेल्या सर्व लाभार्थींना अनुदान वाटप झाले आहे. त्यामुळे अजून ५ हजार कामांची आखणी झालेली आहे. याबाबत शासनाकडून वाढीव उद्दिष्ट घेतले जाईल. एकूणच शेततळ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी