शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:40 IST

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली.

ठळक मुद्दे९ हजार कामे पूर्ण : शेतकऱ्यांना ४५ कोटींचा हातभार, १८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. त्यात मे २०१८ अखेर अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापोटी शेतकºयांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे ४५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. या योजनेतून १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये ‘मागेल त्याला शेतततळे’ ही योजना आणली.जिल्हा, लक्षांक,पूर्ण कामेअहमदनगर ९२००, ९१००औरंगाबाद ९१००, ६९२०नाशिक ९०००, ६१०३सोलापूर ८०००, ४७६८बीड ६५००, ५०४३जालना ६०००, ५६५६बुलढाणा ५०००, ३६५१लातूर ४८००, १६२७सांगली ४५००, ३६४३अमरावती ४५००, ३२४८यवतमाळ ४५००, ५०९०नांदेड ४०००, १४८

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला.दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.कामे झालेल्या सर्व लाभार्थींना अनुदान वाटप झाले आहे. त्यामुळे अजून ५ हजार कामांची आखणी झालेली आहे. याबाबत शासनाकडून वाढीव उद्दिष्ट घेतले जाईल. एकूणच शेततळ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी