शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:40 IST

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली.

ठळक मुद्दे९ हजार कामे पूर्ण : शेतकऱ्यांना ४५ कोटींचा हातभार, १८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. त्यात मे २०१८ अखेर अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापोटी शेतकºयांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे ४५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. या योजनेतून १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये ‘मागेल त्याला शेतततळे’ ही योजना आणली.जिल्हा, लक्षांक,पूर्ण कामेअहमदनगर ९२००, ९१००औरंगाबाद ९१००, ६९२०नाशिक ९०००, ६१०३सोलापूर ८०००, ४७६८बीड ६५००, ५०४३जालना ६०००, ५६५६बुलढाणा ५०००, ३६५१लातूर ४८००, १६२७सांगली ४५००, ३६४३अमरावती ४५००, ३२४८यवतमाळ ४५००, ५०९०नांदेड ४०००, १४८

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला.दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.कामे झालेल्या सर्व लाभार्थींना अनुदान वाटप झाले आहे. त्यामुळे अजून ५ हजार कामांची आखणी झालेली आहे. याबाबत शासनाकडून वाढीव उद्दिष्ट घेतले जाईल. एकूणच शेततळ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी