शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करा, ॲड. अजित काळे यांची मागणी

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 9, 2023 12:35 IST

Ahmednagar: निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी वाकडी जवळील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बोलताना केली.

- सचिन धर्मापूरीकरअहमदनगर - निळवंडे डाव्या कालव्याचे टेल भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी वाकडी जवळील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बोलताना केली.

उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील ०६ गावांसह १८२ अवर्षणग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील विक्रांत रुपेंद्र काले व समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांच्या जनहित याचिका व जनरेट्यामुळे मार्गी लागले असून दि.३१ मे रोजी त्याची तब्बल ०६ मुदत वाढीनंतर राज्य सरकारला व जलसंपदा विभागाला डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी लागली आहे. दरम्यान विलंबामुळे जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले गेले आहे.

कालवा कृती समितीचे विधिज्ञ अजित काळे यांचा वाकडी नजीक धनगरवाडी येथे कालवा पाहणी दौरा आयोजित केला होता, त्यावेळी ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते.

याप्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, संघटक नानासाहेब गाढवे, रावसाहेब मासाळ, राजेंद्र थोरात, राजू नामदेव रक्टे, साहेबराव आदमाने, अनिल पुंजा रक्टे, दगडू रक्टे, आलाराम रक्टे, अनिल भोंडे, पुंजाजी रक्टे, अशोक लांडे, बाळासाहेब शेळके, अण्णा आदमाने, धनगरवाडी व लांडेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

डाव्या कालव्याच्या एस्केप उभारणी व शिर्ष विमोचकाचे (एच.आर.) बांधकाम निविदा दि.१३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या असून उर्वरित कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच चाऱ्या अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे. या दुष्काळी टापुतील चाऱ्या आणि वरील कामांची निविदा प्रसिद्ध करून सदर कामे तातडीने पूर्ण करणे व त्या भागातील पाझरतलाव, साठवण बंधारे, बंडीग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदीत पाणी सोडले तर शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविणे आणि चारा पिके घेणे सोपे होऊन दुष्काळ सुसह्य होणार आहे. त्यामुळे वरील कामे तातडीने हाती घेऊन त्याची निविदा निळवंडे कालवा कृती समितीच्या वरील जनहित याचिकेतील मागणी प्रमाणे पूर्ण होणे गरजेचे आहे. तरी वरील मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही ॲड.अजित काळे यांनी शेवटी केली आहे.

त्यावेळी जलसंपदा विभागाचे माजी अभियंता अकीलभाई शेख, कनिष्ठ अभियंता संदीप साबळे, निखिल आदिक आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीFarmerशेतकरी