शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अहमदनगर शहर बस सेवा बंद; राजकीय कुरघोडीचा फटका ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.

अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख रुपये याप्रमाणे ८० लाख रुपये महापालिकेने थकवल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अ‍ॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा बंद केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.

सध्या शहरातील विविध मार्गांवरुन १५ बसेस सुरू होत्या. वाहनतळ उपलब्ध करून न देणे, नुकसानीपोटी अनुदान न देणे, करारभंग करणे यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय यशवंत अ‍ॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी घेतला. गाडे यांनी यापूर्वी दोन वेळा महापालिकेला नोटीस दिली होती. मात्र त्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडे यांनी केला आहे.

एका पक्षाने सुरु केलेली शहर बससेवा दुस-या पक्षाने बंद करायची ही राजकीय कुरघोडी आहे. यात सर्वसामान्यांचा बळी जात आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे़ रिक्षावाले प्रवाशांची मोठी लूट करतात. रिक्षावाल्यांच्या संघटनांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या मुजोरीला बळ देण्यासाठीच हा निर्णय घेतला की काय, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.-अनिल जगताप

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका