शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अहमदनगर-बीड रेल्वेची वेग चाचणी यशस्वी; नारायणडोहो ते सोलापूरवाडी दरम्यान धावली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 19:30 IST

अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.

योगेश गुंडकेडगाव : चार वर्षांपासून सुरू असलेल्या अहमदनगर ते बीडरेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.अहमदनगर व मराठवाड्यास जोडणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्याची वाहतूक अधिक सोयीस्कर होणार आहे. २०१७ मध्ये नगर रेल्वेस्थानक ते नगर तालुक्यातील नारायणडोहो या २५ किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी झाल्यांनतर नारायणडोहो ते सोलापूरवाडी (ता. आष्टी, जि. बीड) या दुसऱ्या टप्प्यातील २३ कि. मी.अंतराचे काम नुकतेच संपले. या मार्गावरील वेग चाचणीसाठी महिनाभरापासून तयारी सुरू होती.त्यानुसार या मार्गावरील गावकऱ्यांना दोन दिवसांपासूनच सावध करण्यात आले होते. सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.तिवारी, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, मंडळ रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, उपमुख्य अभियंता चंद्रभूषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी.पैठणकर, अभियंता विद्याधर धांडोरे आदी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली.यावेळी या रेल्वेगाडीने ताशी १२२ कि.मी.अंतर कापत बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी गाठली. ही चाचणी यशस्वी झाल्याने सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी जल्लोष करीत समाधान व्यक्त केले. या मार्गाचा तिसरा टप्पा सोलापूरवाडीपासून सुरू होणार आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBeedबीडrailwayरेल्वे