शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अहमदनगर जिल्ह्यात उद्या चक्काजाम : शाळा, कॉलेज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:08 IST

सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अहमदनगर: सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.येथील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अहमदनगर सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीस समन्वयक बाळासाहेब पवार, गोरख शिंदे, अभिषेक कळमकर, सतीष मरकड, संजय गाडे, बहिरणाथ वाकळे, यशवंत तोडमल, रेखा जरे, सविता मोरे, अभिजित वाघ, अभिजित खोसे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान कायगाव टोका येथे मृत पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कायगाव टोका येथील दुर्देवी घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली असली तरी नगरमध्ये दुसऱ्या दिवशी बुधवारी बंद पुकारण्यावर यावेळी चर्चा झाली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एक दिवस उशिराने बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बाळासाहेब पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाच्या वतीने लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. परंतु, त्याची दाखल घेत गेली नाही. मराठा समाजावर हा अन्याय असून, अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कायदा हातात न घेता शहर बंद आणि त्यानंतर शहरातून जाणारे सर्व महामार्गावरील वाहतूक रोखण्यात येईल. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सायंकाळी सात वाजता बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.शाळा महाविद्यालये आठ दिवस बंदसमाज बांधवाचा आंदोलनादरम्यान दुर्देवी अंत झाला. आठ दिवस शहरासह उपनगरांतील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन स्मायलिंग अस्मिताचे यशवंत तोडमल यांनी केले. शहरातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण आठ दिवस शाळेत न जाता घरी बसतील. ते आंदोलनातही सहभागी होणार नाहीत. शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या प्रमुखांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यांनी आंदोलनास पाठींबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.शहरवाशीयांची गैरसोय टाळण्यासाठी जनजागृतीशहर बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी शहराह उपनगरांत आंदोलनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. मंगळवारी दिवसभर रिक्षा फिरविण्याचेही यावेळी ठरले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarathaमराठा