शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"

By शेखर पानसरे | Updated: December 11, 2022 16:08 IST

बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे

शेखर पानसरे

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना गती दिली, त्यासाठी भरीव निधी दिला. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. परंतू जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली. अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.    

रविवारी (दि.११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी दुष्काळग्रस्तांना मिळाले पाहिजे, हाच कायम आग्रह राहणार आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे मार्गी लावली. २०१४ ते २०१९ या काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. असेही माजी महसूलमंत्री, आमदार थोरात म्हणाले.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDamधरणAhmednagarअहमदनगर