शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"

By शेखर पानसरे | Updated: December 11, 2022 16:08 IST

बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे

शेखर पानसरे

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना गती दिली, त्यासाठी भरीव निधी दिला. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. परंतू जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली. अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.    

रविवारी (दि.११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी दुष्काळग्रस्तांना मिळाले पाहिजे, हाच कायम आग्रह राहणार आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे मार्गी लावली. २०१४ ते २०१९ या काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. असेही माजी महसूलमंत्री, आमदार थोरात म्हणाले.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDamधरणAhmednagarअहमदनगर