शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"

By शेखर पानसरे | Updated: December 11, 2022 16:08 IST

बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे

शेखर पानसरे

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना गती दिली, त्यासाठी भरीव निधी दिला. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. परंतू जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली. अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.    

रविवारी (दि.११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी दुष्काळग्रस्तांना मिळाले पाहिजे, हाच कायम आग्रह राहणार आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे मार्गी लावली. २०१४ ते २०१९ या काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. असेही माजी महसूलमंत्री, आमदार थोरात म्हणाले.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDamधरणAhmednagarअहमदनगर