शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"

By शेखर पानसरे | Updated: December 11, 2022 16:08 IST

बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे

शेखर पानसरे

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना गती दिली, त्यासाठी भरीव निधी दिला. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. परंतू जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली. अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.    

रविवारी (दि.११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी दुष्काळग्रस्तांना मिळाले पाहिजे, हाच कायम आग्रह राहणार आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे मार्गी लावली. २०१४ ते २०१९ या काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. असेही माजी महसूलमंत्री, आमदार थोरात म्हणाले.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDamधरणAhmednagarअहमदनगर