शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मंत्रिगटाच्या बैठकीनंतर गळीत हंगामाची लगबग

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : नाशिक विभागात अद्याप यंदाच्या साखर कारखानदारीची लगबग सुरू झालेली नाही. पुढील महिन्यात मंत्री गटाच्या बैठकीनंतर राज्यातील साखर कारखानदारीचे धोरण ठरविण्यात येणार आहे.

अहमदनगर : नाशिक विभागात अद्याप यंदाच्या साखर कारखानदारीची लगबग सुरू झालेली नाही. पुढील महिन्यात मंत्री गटाच्या बैठकीनंतर राज्यातील साखर कारखानदारीचे धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर यंदाच्या गळीत हंगामाचे धोरण ठरणार आहे. दरम्यान, नाशिक विभागातील १९ पैकी १० साखर कारखाने एफआरपी अदा करण्यासाठी सॉफ्ट लोनसाठी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात विक्रमी गळीत हंगाम झाला होता. सव्वा कोटी मेट्रीक टनाच्या जवळपास साखरेचे गाळप झाले. मात्र, त्यानंतर साखरेला भाव नसल्याने विभागातील जवळपास सर्व कारखान्यांचा एफआरपीनुसार दर देण्यावरून प्रश्न निर्माण झाला होता. आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखानदारीला मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखानदारीला सॉफ्टलोन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी नियम, अटी टाकण्यात आल्या असून त्यास पात्र ठरणारे कारखानाने या लोनसाठी पात्र ठरणार आहे. जिल्ह्यात ज्ञानेश्वर, मुळा, गंगामाई आणि जयश्रीराम या कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपीनुसार दर अदा केलेला आहे, तर अशोक, व्दारकाधीश, संजीवनी, कादवा, गंगामाई, कोपरगाव, संगमनेर, श्रीगोंदा, कुकडी आणि ज्ञानेश्वर सॉफ्ट लोनसाठी पात्र ठरलेले आहेत. या कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती, राज्य सहकारी आणि खासगी बँकांकडून एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची देणी अदा करण्यासाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक, साखर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, चालू गळीत हंगामासाठी अद्याप कोणतीच हालचाल नाही. कृषी विभाग आणि कारखान्यांकडून जिल्ह्यात उभ्या उसाची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे. महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पुढील महिन्यात राज्यातील गळीत हंगामाच्या नियोजनासाठी मंत्रीगटाची बैठक होणार आहे. त्यानंतर गळीत हंगामाचे धोरण निश्चित होणार आहे. ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यामुळे यंदा राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने यल्गार पुकारलेला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रश्नी गत आठवड्यात युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांची साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत पुण्यात बैठक झालेली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी अद्याप संप मागे घेण्यात आलेला नाही. लवकर ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक होवून निर्णय घेण्यात येणार आहे. गतवर्षी राजकीय मंडळींनी कामगारांचा संप मोडून काढला होता. यंदा तशी परिस्थिती होवू देणार नसल्याचे राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम, कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)