शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुरंगी लढतीमुळे अकोलेत चुरस; पिचडांचे पक्षांतर; विरोधकांचा एकास एक उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:01 IST

अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षे विधानसभेसाठी मशागत करणाºयांची पंचायत झाली आणि त्यांनाही पक्ष बदलावा लागला. ‘मसाला तोच मात्र लेबल बदलून’ असे चित्र मतदारसंघात आहे. वंचितने दिलेल्या उमेदवारीचा परिणाम शून्य जाणवत असल्याने यंदाची ‘पिचड-लहामटे’ ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

अकोले विधानसभा - हेमंत आवारी ।  अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षे विधानसभेसाठी मशागत करणाºयांची पंचायत झाली आणि त्यांनाही पक्ष बदलावा लागला. ‘मसाला तोच मात्र लेबल बदलून’ असे चित्र मतदारसंघात आहे. वंचितने दिलेल्या उमेदवारीचा परिणाम शून्य जाणवत असल्याने यंदाची ‘पिचड-लहामटे’ ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.लाल बावटा व पुरोगामी चळवळीचा बालेकिल्ला अशी तालुक्याची पूर्वी ओळख होती. त्याचे भगवेकरण होण्यास सुरुवात झाली. अनेक वेळा पिचड विरोधक विजयाच्या समीप गेले पण मतविभाजनाचा फायदा पिचड यांनाच मिळत गेला. यावेळी ‘एकास एक’ लढत आहे. कॉंग्रेसी विचारधारेतून आलेले पिचड यावेळी भाजपत गेले. १९७७-७८ ला पहिला पराभव पचवल्यानंतर १९८० ते २००९ पर्यंत मधुकर पिचड यांनी सातवेळा निवडून येत तालुक्याची धुरा संभाळली. २०१४ ला राष्ट्रवादीकडून वैभव पिचड आमदार झाले. पिचडांनी भाजपत प्रवेश केल्याने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन डॉ. लहामटे यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. पिचडांचे पक्षांतर व विरोधकांची एकी या दोन्ही बाबी प्रथमच घडत आहे. यात कोणाची सरशी होणार हे या निवडणुकीत ठरेल. गेली चाळीस वर्षातील सात पंचवार्षिकमधून माजी मंत्री पिचड यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे, आ.पिचड यांचा गत पाच वर्षाचा विधानसभेतील अनुभव, भाजपात प्रवेश करताच वीज उपकेंद्रांना मिळालेली मंजुरी, कोल्हार घोटी राज्य मार्गासाठी युती सरकारने दिलेला १६८ कोटींचा निधी, अगस्ती कारखाना व अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून शेतक-यांचा केलेला विकास, पर्यटन विकासाची झालेली कामे या बाबी पिचड सभांमधून मांडत आहेत. साडेचार पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य या नात्याने लहामटे व भांगरे यांनी भरीव विकास कामे केली. पिचडांमुळे तालुक्याचा विकास रखडला हे लहामटे यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. शेतकरी नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, डॉ. अजित नवले, विनय सावंत या नेत्यांची लहामटे यांना साथ आहे. लहामटे यांना एक संधी देऊन पहा. तालुक्यात परिवर्तन घडेल अशीही मांडणी केली जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पठार भागात लहामटे यांच्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019