शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

दुरंगी लढतीमुळे अकोलेत चुरस; पिचडांचे पक्षांतर; विरोधकांचा एकास एक उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:01 IST

अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षे विधानसभेसाठी मशागत करणाºयांची पंचायत झाली आणि त्यांनाही पक्ष बदलावा लागला. ‘मसाला तोच मात्र लेबल बदलून’ असे चित्र मतदारसंघात आहे. वंचितने दिलेल्या उमेदवारीचा परिणाम शून्य जाणवत असल्याने यंदाची ‘पिचड-लहामटे’ ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

अकोले विधानसभा - हेमंत आवारी ।  अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षे विधानसभेसाठी मशागत करणाºयांची पंचायत झाली आणि त्यांनाही पक्ष बदलावा लागला. ‘मसाला तोच मात्र लेबल बदलून’ असे चित्र मतदारसंघात आहे. वंचितने दिलेल्या उमेदवारीचा परिणाम शून्य जाणवत असल्याने यंदाची ‘पिचड-लहामटे’ ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.लाल बावटा व पुरोगामी चळवळीचा बालेकिल्ला अशी तालुक्याची पूर्वी ओळख होती. त्याचे भगवेकरण होण्यास सुरुवात झाली. अनेक वेळा पिचड विरोधक विजयाच्या समीप गेले पण मतविभाजनाचा फायदा पिचड यांनाच मिळत गेला. यावेळी ‘एकास एक’ लढत आहे. कॉंग्रेसी विचारधारेतून आलेले पिचड यावेळी भाजपत गेले. १९७७-७८ ला पहिला पराभव पचवल्यानंतर १९८० ते २००९ पर्यंत मधुकर पिचड यांनी सातवेळा निवडून येत तालुक्याची धुरा संभाळली. २०१४ ला राष्ट्रवादीकडून वैभव पिचड आमदार झाले. पिचडांनी भाजपत प्रवेश केल्याने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन डॉ. लहामटे यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. पिचडांचे पक्षांतर व विरोधकांची एकी या दोन्ही बाबी प्रथमच घडत आहे. यात कोणाची सरशी होणार हे या निवडणुकीत ठरेल. गेली चाळीस वर्षातील सात पंचवार्षिकमधून माजी मंत्री पिचड यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे, आ.पिचड यांचा गत पाच वर्षाचा विधानसभेतील अनुभव, भाजपात प्रवेश करताच वीज उपकेंद्रांना मिळालेली मंजुरी, कोल्हार घोटी राज्य मार्गासाठी युती सरकारने दिलेला १६८ कोटींचा निधी, अगस्ती कारखाना व अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून शेतक-यांचा केलेला विकास, पर्यटन विकासाची झालेली कामे या बाबी पिचड सभांमधून मांडत आहेत. साडेचार पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य या नात्याने लहामटे व भांगरे यांनी भरीव विकास कामे केली. पिचडांमुळे तालुक्याचा विकास रखडला हे लहामटे यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. शेतकरी नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, डॉ. अजित नवले, विनय सावंत या नेत्यांची लहामटे यांना साथ आहे. लहामटे यांना एक संधी देऊन पहा. तालुक्यात परिवर्तन घडेल अशीही मांडणी केली जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पठार भागात लहामटे यांच्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019