शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बदलीस अपात्र ६१ शिक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:30 IST

आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. 

अहमदनगर : आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी सादर केला.शिक्षण विभागाकडून शिक्षकांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ही तपासणी सुरू होती. बुधवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींवर मध्यंतरी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान शिक्षकांनी दाखल नव्याने पुरावे दिले होते. परंतु, त्याची खात्री केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षण विभागाकडून ६१ शिक्षकांना आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशयाच्या नोटिसा पाठविल्या असून, उर्वरित २० शिक्षकांचा निकाल राखीव ठेवला आहे. त्यावर मुख्यकार्यकारी अधिका-यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.आॅनलाईन बदली करताना संवर्ग १ व २ मधील शिक्षकांना प्राधान्य दिले गेले. त्याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतला. परंतु, त्यांच्यामुळे गैसोय झालेल्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर अक्षेप घेत तक्रारी केल्या़ त्याची दाखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली.बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांच्या जागी विस्थापित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. अमरावती जिल्हा परिषदेने बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या असून, त्यांच्या बदल्या दुर्गम भागात केल्या आहेत. त्यामुळे विस्थापितांच्या आशा पल्लवित झाल्या असून, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने अपात्र शिक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.३२ शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणावर प्रश्नजिल्ह्यातील २९ शिक्षकांनी दाखल केलेल्या आरोग्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने प्रमाणपत्र दिलेले शिक्षक ठणठणतीत असल्याचा अहवाल दिला आहे. उर्वरित संवर्ग २ मध्ये ३२ शिक्षक पती-पत्नींनी एकत्रिकरण झाले असून, त्यांनी दिलेले दाखले चुकीचे असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे ३१ शिक्षक पती-पत्नींच्या एकत्रिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद