शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:52 IST

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

अहमदनगर:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत असले तरी महाविकास आघाडीमधील नेते मंडळी तिन्ही पक्षांचे सरकार कसे उत्तम काम करत आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भर पडली आहे. महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. या मेळाव्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. बाळासाहेब थोरात यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन मिळत आले आहे आणि त्याच उद्देशाने येथे आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आमची महाविकास आघाडी म्हणजे  ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचे एकमेकांशी साखरेएवढे गोड संबंध आहेत. सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी, तसेच तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले आहेत. या तीन पक्षांत शहरी आणि ग्रामीण भागात कामाचा चांगला अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे क्रिकेट टीमप्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वातावरण चांगले असले की विकासाला वाव मिळतो. महाविकास आघाडीच्या सकारमधील तिन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण आहे. मंत्री झाल्यापासून ज्येष्ठांकडून शिकतो आहे. अधिवेशनातही ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते. आता कोरोना संकट कमी झाल्याने राज्यभर फिरणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही

मुळात शिवसेनेचा स्वभावच असा आहे की, आम्ही पोटात एक आणि ओठात एक असं करत नाही. कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही. आमचे मन साफ आहे. त्यामुळे आधीपासूनच सर्वांशी संबंध चांगले होते आणि त्याचाच उपयोग झाला व आम्ही एकत्र आलो. तीन अनुभवी पक्ष यामध्ये एकत्र आले आहेत. शिवसेनेला प्राधान्याने शहरी भागातील अनुभव आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ग्रामीण भागातील जास्त अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवांचा फायदा शहरी आणि ग्रामीण भागातील धोरणे राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे राज्यात प्रगती होत राहणारच. ग्रामीण भागातील कामे मला समजून घ्यायची आहेत, त्याची आमच्या मतदारसंघात कशी अंमलबजवणी करता येईल, ते पहायचे आहे. फक्त पुढे जाण्यात अर्थ नाही, कसे पुढे जायचे, याचे नियोजन करून पुढे गेले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेSangamnerसंगमनेरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी