शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:52 IST

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

अहमदनगर:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत असले तरी महाविकास आघाडीमधील नेते मंडळी तिन्ही पक्षांचे सरकार कसे उत्तम काम करत आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भर पडली आहे. महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. या मेळाव्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. बाळासाहेब थोरात यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन मिळत आले आहे आणि त्याच उद्देशाने येथे आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आमची महाविकास आघाडी म्हणजे  ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचे एकमेकांशी साखरेएवढे गोड संबंध आहेत. सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी, तसेच तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले आहेत. या तीन पक्षांत शहरी आणि ग्रामीण भागात कामाचा चांगला अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे क्रिकेट टीमप्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वातावरण चांगले असले की विकासाला वाव मिळतो. महाविकास आघाडीच्या सकारमधील तिन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण आहे. मंत्री झाल्यापासून ज्येष्ठांकडून शिकतो आहे. अधिवेशनातही ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते. आता कोरोना संकट कमी झाल्याने राज्यभर फिरणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही

मुळात शिवसेनेचा स्वभावच असा आहे की, आम्ही पोटात एक आणि ओठात एक असं करत नाही. कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही. आमचे मन साफ आहे. त्यामुळे आधीपासूनच सर्वांशी संबंध चांगले होते आणि त्याचाच उपयोग झाला व आम्ही एकत्र आलो. तीन अनुभवी पक्ष यामध्ये एकत्र आले आहेत. शिवसेनेला प्राधान्याने शहरी भागातील अनुभव आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ग्रामीण भागातील जास्त अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवांचा फायदा शहरी आणि ग्रामीण भागातील धोरणे राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे राज्यात प्रगती होत राहणारच. ग्रामीण भागातील कामे मला समजून घ्यायची आहेत, त्याची आमच्या मतदारसंघात कशी अंमलबजवणी करता येईल, ते पहायचे आहे. फक्त पुढे जाण्यात अर्थ नाही, कसे पुढे जायचे, याचे नियोजन करून पुढे गेले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेSangamnerसंगमनेरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी