शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोपरगावात उभ्या कारने घेतला पेट; लाखोंचे नुकसान 

By रोहित टेके | Updated: April 5, 2023 18:42 IST

मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने अचानक पेट घेतला.

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने बुधवारी (दि.५) दुपारी अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली. मात्र, कार जळून खाक झाल्याने बाबासाहेब ठाकरे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाबासाहेब ठाकरे (रा.भोजडे चौकी) हे बुधवारी दुपारी पुतण्या किरण यांच्या बरोबर भोजडे चौकी येथून संवत्सर शिवारातील आपल्या शेतावर शेती कामासाठी गेले होते. 

त्या ठिकाणी मुंबई- नागपूर महामार्गाच्याकडेला त्यांनी महिंद्रा काँटो कार (क्र.एम.एच. १५ इपी ७०८६ ) ही उभी केली. काही वेळातच उभ्या कारने अचानक पेट घेतला. ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या आणि कोल्हे कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळवले. यावेळी दोन्ही अग्निशमन दल  घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली तोपर्यंत काल पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने कार मध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग विझवण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे फायरमन प्रमोद सिंनगर, सागर काटे, चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcarकारfireआग