शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

७१८ जणांना कावीळ

By admin | Updated: February 18, 2023 10:50 IST

अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले

अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले असून, काविळीच्या रुग्णांची संख्या गुरुवारी ७१८ वर पोहोचली आहे़ त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठा होत होता़ परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच होता़ हे पाणी पिल्याने परिसरातील नागरिकांना कावीळ रोगाची लागण झाली़ सुरुवातीला ही संख्या कमी होती़ मात्र काही दिवसांतच ती वाढली़ परिसरातील नगरसेवकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या़ फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून, घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आणखी २० जणांना कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे काविळीच्या रुग्णांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे़ तसेच बालिकाश्रम रस्ता परिसरातही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून गुरुवारी करण्यात आली़ या तक्रारीची दखल घेऊन उपायुक्त बेहरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली़ दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे कावीळ रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे़ दिवसेंदिवस काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, उपाय योजनाही हाती घेण्यात आल्या आहेत़ मात्र काविळीवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश येत आहे़घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ पिण्याचे पाणी तपासणे, हॉटेलमधील कामगारांचे आरोग्य तपासणी करणे, साथ रोग असल्यास रूग्णांवर जागेवरच उपचार करणे,यासारख्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी गळतीची शोध मोहीम हाती घेतली आहे़तक्रार प्राप्त झाल्यास परिसराची पाहणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़