शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

समायोजनाविना ६६९ कोटी, जिल्हा परिषदांमधील आर्थिक अनागोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:21 IST

राज्यातील जिल्हा परिषदांच्या लेख्यांमध्ये ३१ मार्च २०१६ अखेर ६६९ कोटी ६८ लाख रुपयांच्या अनामत ठेव रकमांचे समायोजन झाले नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांच्या लेख्यांवरील सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यातील जिल्हा परिषदांच्या लेख्यांमध्ये ३१ मार्च २०१६ अखेर ६६९ कोटी ६८ लाख रुपयांच्या अनामत ठेव रकमांचे समायोजन झाले नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांच्या लेख्यांवरील सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोरआली आहे.हा अहवाल नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला. त्यातून राज्यातील पंचायतराज संस्थांमधील आर्थिक अनागोंदीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना व संबंधित खात्याच्या अधिकाºयांना वेगवेगळ्या कारणांसाठीदिलेल्या आगाऊ रकमांचे ३१ मार्च २०१६ पर्यंत बºयाच प्रमाणात समायोजन झालेले नव्हते. ३१ मार्च २०१६ ला राज्यातील जिल्हा परिषदांच्या लेख्यांमध्ये ५४ कोटी ८२ लाख रुपयांच्या आगाऊ रकमांचे समायोजन झालेले नव्हते. तर समायोजित व्हावयाच्या अनामत ठेव रकमांचा आकडा ६६९ कोटी ६८ लाख रुपयांवर पोहोचल्याचे विधिमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या २०१५ - २०१६ सालाच्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.लेखापरीक्षण अहवालांतील आक्षेपांवर अभिप्रायसन २०१५-१६ च्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या लेखापरीक्षण अहवालांमध्ये नोंदविलेल्या आक्षेपांवर पुनर्विलोकन अहवालात अभिप्राय नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदांनी व्यक्तिगत दिलेली कर्जे, त्यांची वसुली व थकबाकी यांचे लेखे, जिल्हा परिषदांनी कर्जाचे लेखे व्यवस्थित व अद्ययावत ठेवण्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदांकडे मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. पण त्यांचे लेखे ठेवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या ठेव नोंदवह्या अपूर्ण होत्या. मागील वर्ष अखेरची शिल्लक बिनचूकपणे पुढे ओढण्यात आलेली नव्हती.जमा व प्रदान रकमांच्या नोंदी नोंदवह्यांमध्ये केलेल्या नव्हत्या. त्यांचा वार्षिक लेख्यांशी मेळ बसत नव्हता. त्याचप्रमाणे ठेवी परत देय होतात, तेव्हापासून तीन वर्षांपेक्षा अधिक काळ अदत्त असलेल्या ठेवी महसूल खाती जमा करण्याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहितेनुसार कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. लाभार्थींना कर्ज रूपाने दिलेल्या रकमांच्या लेख्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच कर्जाच्या वापरासंबंधी प्रमाणपत्रे मुदतीत सादर केली नाहीत, असा ठपकाही पुनर्विलोकन अहवालात ठेवण्यात आला आहे.अग्रिम रकमांचा तपशीलवर्ष एकूण रुपये (लाखांत)१९६२-६३ पूर्वीचे ते २०१०-११ १४४२.८४२०११-२०१२ १३६३.९९२०१२-२०१३ ३९९.८९२०१३-२०१४ ५०२.०७२०१४-१५ ७०३.४३२०१५-१६ १०६९.९५एकूण ५४८२.१६अनामत ठेव रकमांचा तपशीलवर्ष प्रलंबित अनामत ठेव(लाखांत)१९६२-६३ ते २०१०-११ १८११७.१८२०११-२०१२ ४९७६.०९२०१२-२०१३ ७२५३.२६२०१३-२०१४ ७९०४.७५२०१४-१५ १२२७.६२२०१५-१६ १६४६९.१५एकूण ६६९६८.०६

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार