शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

लाखात ६० मातांचा मृत्यू

By admin | Updated: July 10, 2014 00:36 IST

सुदाम देशमुख, अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये बाळंतपणामध्ये मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे एक लाखामध्ये ६० असे आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ मातांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे.

सुदाम देशमुख, अहमदनगरनगर जिल्ह्यामध्ये बाळंतपणामध्ये मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे एक लाखामध्ये ६० असे आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ मातांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू हे नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात होत असल्याचेही वास्तव समोर आले आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव, खासगी रुग्णालयापर्यंत जाण्यात झालेला उशिर आणि प्रसूतीत्तोर रक्तस्त्राव झाल्याने महिलांचा बाळंतपणात मृत्यू होत आहे. या कारणांमुळे महिलांचे मातृत्त्वच धोक्यात आले आहे.गरोदर असताना योग्य आहार, व्यायाम व काळजी न घेतल्यामुळे प्रसूतीच्या वेळी महिलांना मृत्यू येण्याची शक्यता असते. अशा मृत्युचे प्रमाण हे एक हजारांमध्ये तीन असे आहे. सिझेरियनची वेळ आली तरच अशा मृत्युचा धोका अधिक असतो. गर्भधारणा झाल्यापासून योग्य नियोजन केले तर असा मृत्यू टाळता येतो.नॉर्मल आणि सिझेरियन अशा दोन प्रकारच्या प्रसूती मोठ्या प्रमाणावर होतात. खासगी रुग्णालयामध्ये नातेवाईकांना भीती दाखवून सिझेरियनचा सपाटा लावला जातो. शासकीय रुग्णालयांमध्ये मात्र नॉर्मल प्रसूतीवरच भर दिला जातो. प्रसूतीदरम्यान बाळ किंवा मातेला धोका असल्यासच सिझेरियन करावे असा नियम आहे. काही रुग्णालयांमध्ये मात्र हा नियम पायदळी तुडविला जातो. कमी खर्च आणि सुरक्षित प्रसूतीसाठी अनेक महिला शासकीय रुग्णालयांकडे धाव घेतात.पूर्वीच्या काळी गर्भवती महिला दळण दळणे, पाणी आणणे, घरातील कामे करीत होत्या. त्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा. जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल, प्रसूतीकाळात रुग्णांची नसलेली सहनशक्ती, व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे प्रसूती धोकेदायक बनली आहे. असा असावा आहारहिरव्या पालेभाज्या, ऋतुमानानुसार फळे, मोड आलेली कडधान्ये, दूध, तिसऱ्या महिन्यापासून रक्तवाढीच्या गोळ््या (किमान १०० दिवस) घेणे जरुरी आहे. भाज्यांची साले न काढता भाज्या वापराव्यात. स्वयंपाक करताना पोषक घटकांचा नाश होणार नाही,याची काळजी घ्यावी.नगर जिल्ह्यामध्ये एक लाख महिलांमागे ६० महिलांचा बाळंतपणात मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. मात्र आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ७५ हजार प्रसूतीमागे ३५ महिलांचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला आहे. उत्तरेमध्ये महिलांच्या मृत्युचे प्रमाण सर्वाधिक आहे. रुग्णालयांमध्ये असलेल्या असुविधांची पाहणी करून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जेणेकरून बाळंतपणामध्ये महिलांचे मृत्युचे प्रमाण कमी होईल. मृत्युच्या कारणांमध्ये आढळलेल्या त्रुटी शोधून त्यावर उपाययोजनाही करण्यात येत आहेत.-डॉ. पी.डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारीअप्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस, वेळेवर औषधे उपलब्ध झाले नसतील, शासकीय रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण जाईपर्यंत झालेला रक्तस्त्राव, वेळेवर तज्ज्ञ डॉक्टर न मिळणे, गुंतागुंतीचे सीझर, काळजी न घेणे, जंतुसंसर्ग आदी कारणांमुळे महिलांचा बाळंतपणात मृत्यू होतो. अलीकडील काळात बाळंतपणामध्ये महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. -डॉ. माधुरी देशमुख (स्त्रीरोग आणि आयुर्वेदतज्ज्ञ)सुरक्षित मातृत्वाची सप्तपदी......पाळणा लांबविणे, थांबविणेप्रशिक्षितांकडून बाळंतपणपाच वैद्यकीय तपासण्यालोहयुक्त गोळ््यांचा वापरआहार व विश्रांतीधनुर्वात प्रतिबंधक लसरुग्णालयात नोंदणी