शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विसापूर कारागृहाचे ५३ कैदी रजा मिळूनही कारागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:30 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नानासाहेब जठार ।  विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.विसापूर कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची असून कारागृहात सध्या ९७ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगणाºया कैद्यांना ४५ दिवसाच्या अभिवचन रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. या सर्व रजेवर जाणाºया कैद्यांना त्यांच्या मूळगावी व शहरात घरी जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाकडून ओळखपत्रे देण्यात आली.कैदी कारागृहातून रवाना करताना त्यांची आरोग्य तपासणी कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ यांनी केली. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व कैदी आपआपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. आणखी सात कैदी अभिवचन रजेवर पाठवण्यास पात्र आहेत. मात्र त्यापैकी काही कैदी कोरोनाचा धोका नको म्हणून सुट्टीवर जाण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यांच्या गावी गेलेले कैदी त्या त्या भागात क्वारंटाईन झाले आहेत, अशी माहिती विसापूर कारागृहाचे तुरूंगाधिकारी बाळकृष्ण जासूद यांनी दिली.

विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार ४५ दिवसांच्या रजेवर पाठवण्यात आले. ४५ दिवसानंतर स्वत: कारागृहात हजर होण्याचे त्यांच्याकडून अभिवचन घेण्यात आले आहे. रजा संपल्यानंतर ते कारागृहात हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विसापूर खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक प्रकाशसिंग परदेशी यांनी सांगितले. 

माझी शिक्षा आणखी अडीच वर्षे बाकी आहे. मला कारागृहाकडून ४५ दिवसांची रजा मिळत आहे. मात्र माझी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला जाण्याची व धोका पत्करण्याची इच्छा नाही. कोलकात्याला जाण्याची व्यवस्था झाली तर जाईन. अन्यथा मी कारागृहातच सुरक्षित आहे, असे कारागृहातील परप्रांतीय कैदी मनीष ठाकूर याने सांगितले.  

मी ठाणे येथील रहिवासी आहे. माझी शिक्षा आणखी दोन वर्षे बाकी आहे. तरीही मी ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर जाणार नाही. कोरोनाचा धोका माझ्यासाठी व कुटुंबातील लोकांसाठी निर्माण करू इच्छित नाही. त्यामुळे कारागृहातच राहणार आहे, असे विसापूर कारागृहातील कैदी प्रशांत पवार याने सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाjailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्या