शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

४५० जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST

श्रीरामपूर : रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर सोमवारी भीतीखाली असलेल्या श्रीरामपूरकरांनी मंगळवारी दडपणातून बाहेर पडत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू केल्याने श्रीरामपूर पुन्हा सावरले.

दंगलीनंतर श्रीरामपूर सावरले : दुकानदारांच्या फिर्यादी श्रीरामपूर : रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर सोमवारी भीतीखाली असलेल्या श्रीरामपूरकरांनी मंगळवारी दडपणातून बाहेर पडत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू केल्याने श्रीरामपूर पुन्हा सावरले. बाजारपेठ सुरळीत होऊन वातावरण पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, दंगलीतील जाळपोळ, दगडफेक, लुटालूटप्रकरणी नुकसानग्रस्त दुकानदारांनी पोलिसात फिर्यादी देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ४५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.प्रसाद क्रॉकरी अँड ग्लासवेअरचे मालक व राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे कार्यकर्ते देविदास काशीनाथ चव्हाण यांनी सोमवारी उशिरा फिर्याद दिली. त्यावरुन माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, बंटी जहागीरदार, सलीम जहागीरदार, रईस जहागीरदार, दानिश शेख, अमन शेख, तौफिक शेख, अतिक बागवान, सर्फराज पठाण, सद्दाम बांगडा, सादिक शेख, अल्तमफ पेंटर, आवेश पोपटिया, पाप्या शेख, फिरोज पोपटिया, अमजद पोपटिया, इम्रान मलिक, नवाज तांबोळी, सलमान शेख, फरदीन रफिक बागवान, शाहीद कुरेशी, सादीक शहा, आसिफ रिक्षावाला, मोहसीन शेख, अफरोज शहा, शरीफ शेख, गुलाब तजीलगणी कुरेशी, मुझबीर हारुण बागवान, अशुक लियाकत पठाण, मुन्ना कटर, झिशान फारूक शेख, शोएब सत्तार शेख, अलीम शरीफ कुरेशी, वसीम रफिक शेख, आदिल मगदूम शेख (सर्व रा. प्रभाग १, श्रीरामपूर) व इतर ३०० जणांविरुद्ध भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ४३६, ५०४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७, आर्म अ‍ॅक्ट ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), (३), १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरी फिर्याद मोहसीन रफिक बागवान (वय २६, फळविक्रेते, रा. सुभेदार वस्ती) यांनी दिली. त्यावरून भाजपचे प्रकाश चित्ते, विहिंपचे विजय जैस्वाल, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, श्रीराम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, संजय यादव, मारूती बिंगले, कुणाल कारंडे, गणेश सुरेश परदेशी, अमोल नानुस्कर (रा. सर्व श्रीरामपूर) व इतर १०० ते १५० जणांविरुद्ध भादंवि ३०७, ३९५, १४३, १४७, १४८, १४९, ४३६, ४३५, ५०४, ११४, ११७, ४२७, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.८ मे रोजी रात्री शिवाजी चौकात आरोपींनी सुदर्शन स्वीटस् दुकानासमोर गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणास जातीय स्वरुप देऊन सोबतच्या लोकांसह हातात पेटते टेंभे, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन फळबाजारात येऊन दुकानांना आग लावली. सर्व दुकानांचे अंदाजे ३० लाखांचे नुकसान करून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे बागवान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक अरविंद भोळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दंगलीमागे षड्यंत्र : विखेश्रीरामपूर : रविवारच्या श्रीरामपूरमधील दंगलीमागे नियोजनपूर्वक आखलेले षड्यंत्र असल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी रात्री येथे सांगितले.दंगलीची झळ बसलेल्या ३२ दुकानदारांना काँग्रेसच्या वतीने त्यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, उपसभापती सचिन गुजर होते. विखे म्हणाले, वाहनांचा धक्का लागून झालेल्या वादानंतर लगेच इतक्या कमी वेळात जाळपोळ, लुटालूट, दगडफेक, दंगल कशी होते? दोन समाजात तेढ व दुही निर्माण करून विपरीत घडविण्याचे या दंगलीमागे नियोजित षड्यंत्र आहे. घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. काँग्रेसच्या वतीने तत्काळ विस्थापितांना आधार देण्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष करण ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन व मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत. आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले, श्रीरामपूर हे सर्व जातीधर्मियांचे गाव असून येथील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळविण्यासाठी विखे यांनी प्रयत्न करावेत. याप्रसंगी जि. प. सभापती बाबासाहेब दिघे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, शिक्षण सभापती राजश्री सोनवणे, कांचन सानप, संगीता मंडलिक, जलीलखान पठाण, संजय फंड, अशोक व भगवान उपाध्ये, संजय छल्लारे, अ‍ॅड. विजय बनकर आदी हजर होते. करण ससाणे यांनी आभार मानले.