शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नगर जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांपैकी अवघे २६ शेतकरी होणार कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 09:42 IST

 पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली.

अहमदनगर : जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील अवघ्या २६ शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांची दिवाळी शासनाने गोड केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत केलेल्या घोषणेनुसार शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस दिवाळीपूर्वीच प्रातिनिधिक स्वरुपात अंमलबजावणी होत आहे. या योजनेचा शुभारंभ मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर हाच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम पालकमंत्री राम शिंदे जिल्हास्तरावर घेणार आहेत.कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची तपासणी करुन लाभार्थ्यांची यादी येणार आहे. या यादीतूनच जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी २५ जोडप्यांची निवड केली जाणार आहे. तसेच मुंबईच्या कार्यक्रमासाठी १ लाभार्थी शेतकरी किंवा एक शेतकरी जोडपे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

लाभार्थींची नावे मिळेनात

राज्य शासनाकडून पात्र लाभार्थींची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळालेली नाही. त्यामुळे नक्की कोणत्या शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे, याबाबत संदिग्ध वातावरण आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मात्र या विषयावर कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार