शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संगमनेरातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे?

By शेखर पानसरे | Updated: December 7, 2022 22:13 IST

जबाबदार अधिकारी बाहेर ; रात्री ‘तहसील’मध्ये दोनच महिला कर्मचारी

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क 

संगमनेर :संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सदस्यपदांसाठी १ हजार ३२५ तर सरपंच पदासाठी २५१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. बुधवारी (दि.७) नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत संगमनेर तहसील कार्यालयात कामकाज सुरू होते. रात्री नऊला कार्यालयात केवळ दोनच महिला कर्मचारी कर्तव्य पार पाडत होत्या. तहसीलदार अमोल निकम यांचा अपघात झाला आहे. त्यांच्यानंतर कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी नव्हते. त्यामुळे ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे सुरू आहे का? असाच प्रश्न पडला आहे.

संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहेत. यात घुलेवाडी, साकूर, तळेगाव दिघे, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबूत बुद्रूक, कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, अंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बुद्रूक, निमोण, वडझरी खुर्द, हंगेवाडी, कनकापूर, करूले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बु्द्रूक, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. निवडणुकांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी अंधार झाल्यानंतर मोबाईल टॉर्चच्या उजेडात काम करत होते.

अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व इतर माहिती घेण्यासाठी पत्रकार तहसील कार्यालयात संध्याकाळी सात वाजेपासून थांबले होते. रात्री नऊ वाजून गेल्यानंतरही माहिती मिळाली नाही. नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी माहिती घेत होत्या, त्यांचे संगणकावर काम सुरू होते. परंतू कार्यालयात इतर कुणीही जबाबदार पुरूष अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. नायब तहसीलदारांची दालने बंद होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sangamnerसंगमनेर