शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
6
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
7
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
8
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
9
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
10
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
11
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
12
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
14
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
15
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
16
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
17
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
18
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
19
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
20
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!

दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:13 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाचार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येला शेतीमालास कमी भाव, गारपीट, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे होत असलेले नुकसान हेच कारण आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या हृदयात वेदनेचा काहूर निर्माण झाला आहे. यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाटपाण्यामुळे ऊस मळे बहरले आणि माळरानावर डाळिंब, द्राक्ष, लिंबोणीच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कृषी समृद्धी आली आहे. शेती फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांचे हजारो कोटीचे कर्ज काढले आहे, परंतु कधी गारपीट, अतिवृष्टी, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे नुकसान होते. या नुकसानीस कंटाळून विदर्भ, मराठवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची मालिका सुरू असताना भीमा नदी काठावरील दिलीप अंकुश घोलप (वय ४५) या शेतकऱ्याने बँक व सावकारांच्या कर्जाचा धसका घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. चांगला पाऊस झाला, चांगले पीक आले तर शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. परिणामी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. या दृष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आणि कर्जाचा बोजा डोईजड झाला की डोक्यात आत्महत्येचा विचार घर करतो अशी परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणामुळे २००६-०७ या वर्षात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१३-१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी जीवनाचा शेवट केला. २०१५-१६ या वर्षात दिलीप घोलप या शेतकऱ्याने आत्महत्या करून धक्का दिला आहे. २०१५-१६ या वर्षात पाऊस पाणी नाही. पाटपाणी मिळण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे वणवा पसरणार आहे. या वणव्यात श्रीगोंद्याची शेती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यातील बळीराजावर हजारो कोटीचे कर्ज आहे हे या कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बँकांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे गरजेचे आहे. सावकाराच्या कर्जालामुक्ती देण्याची गरज आहे. शिवाय जनावरांसाठी छावण्या आणि हाताला काम देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे.