शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:13 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाचार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येला शेतीमालास कमी भाव, गारपीट, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे होत असलेले नुकसान हेच कारण आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या हृदयात वेदनेचा काहूर निर्माण झाला आहे. यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाटपाण्यामुळे ऊस मळे बहरले आणि माळरानावर डाळिंब, द्राक्ष, लिंबोणीच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कृषी समृद्धी आली आहे. शेती फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांचे हजारो कोटीचे कर्ज काढले आहे, परंतु कधी गारपीट, अतिवृष्टी, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे नुकसान होते. या नुकसानीस कंटाळून विदर्भ, मराठवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची मालिका सुरू असताना भीमा नदी काठावरील दिलीप अंकुश घोलप (वय ४५) या शेतकऱ्याने बँक व सावकारांच्या कर्जाचा धसका घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. चांगला पाऊस झाला, चांगले पीक आले तर शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. परिणामी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. या दृष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आणि कर्जाचा बोजा डोईजड झाला की डोक्यात आत्महत्येचा विचार घर करतो अशी परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणामुळे २००६-०७ या वर्षात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१३-१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी जीवनाचा शेवट केला. २०१५-१६ या वर्षात दिलीप घोलप या शेतकऱ्याने आत्महत्या करून धक्का दिला आहे. २०१५-१६ या वर्षात पाऊस पाणी नाही. पाटपाणी मिळण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे वणवा पसरणार आहे. या वणव्यात श्रीगोंद्याची शेती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यातील बळीराजावर हजारो कोटीचे कर्ज आहे हे या कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बँकांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे गरजेचे आहे. सावकाराच्या कर्जालामुक्ती देण्याची गरज आहे. शिवाय जनावरांसाठी छावण्या आणि हाताला काम देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे.