शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:13 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाचार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येला शेतीमालास कमी भाव, गारपीट, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे होत असलेले नुकसान हेच कारण आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या हृदयात वेदनेचा काहूर निर्माण झाला आहे. यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाटपाण्यामुळे ऊस मळे बहरले आणि माळरानावर डाळिंब, द्राक्ष, लिंबोणीच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कृषी समृद्धी आली आहे. शेती फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांचे हजारो कोटीचे कर्ज काढले आहे, परंतु कधी गारपीट, अतिवृष्टी, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे नुकसान होते. या नुकसानीस कंटाळून विदर्भ, मराठवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची मालिका सुरू असताना भीमा नदी काठावरील दिलीप अंकुश घोलप (वय ४५) या शेतकऱ्याने बँक व सावकारांच्या कर्जाचा धसका घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. चांगला पाऊस झाला, चांगले पीक आले तर शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. परिणामी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. या दृष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आणि कर्जाचा बोजा डोईजड झाला की डोक्यात आत्महत्येचा विचार घर करतो अशी परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणामुळे २००६-०७ या वर्षात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१३-१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी जीवनाचा शेवट केला. २०१५-१६ या वर्षात दिलीप घोलप या शेतकऱ्याने आत्महत्या करून धक्का दिला आहे. २०१५-१६ या वर्षात पाऊस पाणी नाही. पाटपाणी मिळण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे वणवा पसरणार आहे. या वणव्यात श्रीगोंद्याची शेती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यातील बळीराजावर हजारो कोटीचे कर्ज आहे हे या कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बँकांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे गरजेचे आहे. सावकाराच्या कर्जालामुक्ती देण्याची गरज आहे. शिवाय जनावरांसाठी छावण्या आणि हाताला काम देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे.