शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ३२७ कोटी रुपयांचा अपहार

By मिलिंदकुमार साळवे | Updated: April 17, 2018 13:19 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे३६ हजार ७९३ प्रकरणे

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे.राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच झाले. या अधिवेशनात वित्त विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक २०१८-१९ सादर करण्यात आले. त्यात स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली. या संचालनालयांतर्गत राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २७ हजार ८५० ग्रामपंचायती, राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्था म्हणजेच २७ महानगरपालिका, १४ महानगरपालिका शिक्षण मंडळे, ६ महानगरपालिका परिवहन उपक्रम, २३३ नगरपालिका, १२४ नगरपंचायती, ५२ नगरपालिका, ४ कृषी विद्यापीठे, १ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व इतर २२७ संकिर्ण संस्थांचे लेखापरीक्षण करण्यात येते.२०१७-१८ च्या सुरुवातीस लबाडी व अपहाराच्या ३२ हजार २७९ प्रकरणांमध्ये २८५ कोटी ४८ लाख ५३ हजार ३०० रूपये अडकले होते. त्यात गेल्या वर्षी नव्याने ४२ कोटी ९३ लाख ९४ हजार ६९१ रूपयांच्या ४ हजार ५७१ प्रकरणांची नव्याने भर पडली. तर ८१ लाख ६ हजार ३९५ रूपयांची ५७ प्रकरणे निकाली निघाली. २०१७-१८ अखेरीस ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची ३६ हजार ७९३ प्रकरणे प्रलंबित आहेत.स्थानिक निधी लेखा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणादरम्यान नोव्हेंबर २०१७ अखेरीस अहमदनगरजिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या सुमारे ४ कोटी रुपयांच्या खर्चावर आक्षेप घेण्यात आल्याने हा खर्च वादग्रस्त ठरला आहे. यात पाथर्डी तालुका आघाडीवर आहे.

या तालुक्यातील ३० प्रकरणांमध्ये - १ कोटी २४ लाख ९८ हजार रूपयांच्या खर्चावर आक्षेप आहेत. कर्जत तालुक्यातील सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतींमध्ये २७ लाख रूपये तर संगमनेरच्या ३३ ग्रामपंचायतींमधील ६५ लाख रूपयांच्या खर्चावर आक्षेप घेण्यात आले आहेत. पारनेर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये ५० लाख ८ हजार रूपयांच्या खर्चावर लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद