अहमदनगर : खते, बियाणे, किटकनाशके विक्रीत खासगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडित काढीत जिल्ह्यात तब्बल २४ बचत गटांनी खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना मिळविला आहे़ सहकारी संस्थाही यात मागे नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत आहे़खते, बियाणे व किटकनाशक विक्री करण्याचा परवाना व्यापारी वर्गातच मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र, आता विविध वस्तुंचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी बचत गट पुढे सरसावत आहेत़ जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री करण्याचा परवाना १९२२ व्यापाऱ्यांनी, ३४६ सहकारी संस्थांनी व २४ बचत गटांनी घेतला आहे़ बियाणे विक्रीसाठी १७९८ व्यापारी, ९६ सहकारी संस्था आणि २४ बचत गटांनी परवाना घेतला आहे़ तर किटकनाशकांची विक्री करण्यासाठी १८८४ व्यापारी, ९७ सहकारी संस्था व २४ बचतगटांनी परवाना घेतला आहे़खत, बियाणे, किटकनाशके विक्री करण्यासाठी नेवासा तालुक्यातील २, पाथर्डी तालुक्यातील १४, शेवगाव तालुक्यातील २, श्रीगोंदा तालुक्यातील ६ गटांनी परवाने घेतले आहेत़ (प्रतिनिधी)असा मिळतो परवानाखत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा परवाना घेण्यासाठी तालुकास्तरावरील कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो़ खत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा अर्ज वेगवेगळा करावा लागतो़ अर्जासोबत किरकोळ डिपॉझिट घेतले जाते़ हा अर्ज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे येतो़ जिल्हा परिषदेचा कृषी विभाग प्राप्त अर्जांची छाननी करतो़ त्यानंतर हे अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे येतात़ त्यानंतर परवाने मंजूर केले जातात़ परवानाधारक विक्रेत्यांवर राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांचे नियंत्रण असते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुशराव माने यांनी दिली़खत विक्रीवर भरखत विक्रीकरण्याकडे व्यापारी, सहकारी संस्था यांचा जास्त जोर असल्याचे आकडेवारीवरुन दिसते़ खत विक्रीसाठी १९२२ व्यापारी व ३४६ सहकारी संस्थांनी परवाने घेतले आहेत़ त्यातुलनेत बियाणे व किटकनाशके विक्रीचे परवाने कमी आहेत़
खत, बियाणे विक्रीचा २४ बचत गटांना परवाना
By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST