शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

वीजनिर्मितीतून २१ कोटींची कमाई

By admin | Updated: April 10, 2024 16:20 IST

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या १८७ दिवस चाललेल्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली.

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या १८७ दिवस चाललेल्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली. या हंगामात प्रथमच सुरू केलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्यास वीज विक्रीतून २१ कोटी १६ लाख रूपयांची भरघोस कमाई झाली. कारखान्याच्या प्रथेनुसार माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या हस्ते विधीवत सांगता पूजा करण्यात आली. अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, संचालक, अधिकार्‍यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून हंगामाची सांगता झाली. यंदाच्या हंगामात सुरुवातीस पावसाचा व्यत्यय, तर मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी ६ ऊस तोडणी यंत्रांची उपलब्धता करण्यात आली. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या ऊस तोडणीस प्राधान्य दिल्याने नियमित ऊस तोडीचा कार्यक्रम काहीसा लांबला. याच हंगामात सुरू झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाने पहिल्याच वर्षी वीज निर्मितीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे स्थान पटकाविले. या प्रकल्पातून कारखान्याचा वीज वापरता वगळता ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला प्रतियुनिट ५ रूपये ८१ पैसे दराने विक्री करण्यात आली. त्यातून कारखान्यास २१ कोटी १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. गळीत हंगामाची साखर उत्पादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वीज प्रकल्प कार्यान्वित राहील. आॅईल कंपन्यांची मागणी पूर्ण झाल्याने इथेनॉल निर्मिती थांबविण्यात आली. तर हंगाम संपल्यानंतरही काही दिवस आसवनी प्रकल्प सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे व कार्यकारी संचालक भास्कर खंडागळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पन्नास हजार मेट्रीक टन उसाचे गाळप कारखान्याने ५ लाख ५० हजार ७८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करुन ५ लाख ९० हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली. या हंगामात २२ जानेवारी २०१४ रोजी एकाच दिवशी ३७१० मेट्रिक टन गळीत झाल्याने एका दिवसात सर्वाधिक गाळपाचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. आसवनी प्रकल्पाद्वारे ४४ लाख ४२ हजार लिटर्स मद्यार्क निर्मिती व आॅईल कंपनीच्या मागणीनुसार १५ लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती व पहिल्याच वर्षी कार्यान्वित झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे ५ कोटी २८ लाख ६८ हजार युनिटस् वीज निर्मिती झाली. त्यातून ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला विक्री केली.