अहमदनगर : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १६५ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांवरील सर्व शिक्षक लसीकरण व कोरोना चाचणी करून शाळेत हजर झाले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक विभागाने दिली.
कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु शाळा सुरू करताना शिक्षकांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. चाचणी निगेटिव्ह असेल तरच मुख्याध्यापकाने शिक्षकांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. शिक्षकांचे लसीकरण झाले की नाही हेही तपासले जात आहे.
ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. मात्र, एकच डोस घेतलेल्यांना चाचणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात १६ जुलै रोजी १४९ शाळा सुरू झाल्या. या शाळांमध्ये पहिल्या दिवशी दीड हजार शिक्षक कार्यरत झाले. हे सर्व शिक्षक कोरोनाचे नियम पाळूनच शाळेत आले, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---------------
आठवी ते बारावी एकूण शाळा - १३०१
आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - १५,०००
पहिल्या दिवशी हजर शिक्षक - १५००
पहिल्या दिवशी हजर विद्यार्थी - १४,७७८
---------
पहिल्या दिवशी १४ हजार विद्यार्थ्यांचा एक साथ नमस्ते
अकोले - ७१८०
संगमनेर - २५१८
कोपरगाव - ८२
राहाता - १६६५
राहुरी- ६१७
श्रीरामपूर- २१४
नेवासा- ११८९
शेवगाव- १६४
पाथर्डी- १९८
जामखेड- ७०
कर्जत- ८०
श्रीगोंदा- ३५२
पारनेर- ३२
नगर- ४१७
एकूण - १४,७७८
------------
पहिल्या दिवशी १५१ शाळा उघडल्या
नगर जिल्ह्यात आठवी ते बारावी १३०१ शाळा असून, त्यात पहिल्या दिवशी १५१ शाळा उघडल्या. पहिल्या दिवशी सुमारे १४ हजार ७७८ विद्यार्थी हजर होते.
------------------
दोन कॉलम फोटो - २१स्कूल ओपेन