शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यातील १६२ पीआय पदोन्नतीच्या प्रतिक्षेत; गृहखात्याचा ढिसाळ कारभार

By अण्णा नवथर | Updated: April 8, 2023 16:28 IST

उपधीक्षक तर दूरच, पण पोलिस ठाणेही गेले 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: राज्यातील पोलिस निरिक्षकांना उपअधीक्षक पदी पदोन्नती देण्याचा निर्णय गत डिसेंबरमध्ये झाला होता. या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र अद्यापही पोलिस निरिक्षकांच्या पदोन्नतीचा आदेश निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील १६२ पोलिस निरिक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. यावर कळस असा की यापैकी काहीजण सेवानिवृत्तदेखील झाले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

राज्याचे गृहखाते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती, यामुळे नेहमीच चर्चेत असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून रणकंदन झाले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे. पोलीस शिपायापासून ते वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या बदल्यांच्या फायलींची अलिकडे गती मंदावली आहे. सरकारच्या या भूमिकेचा फटका राज्यातील १६२ पोलिस निरिक्षकांना बसला आहे. पोलिस निरिक्षकांना उप अधीक्षक पदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पदोन्नीतीची यादी अंतिम केली गेली. ही यादी पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचलीदेखील. त्यांनी ही पदोन्नती गृहीत धरून जबाबदाऱ्यांचे वाटप केले. हे वाटप करताना पदोन्नती मिळालेल्या पोलिस निरिक्षकांना वगळले. यावर कळस असा की, अशा पदोन्नती मिळणार असलेल्या ५० हून पोलिस निरिक्षकांना तर पोलिस ठाणे व विभागातून कार्यमुक्तही केले गेले. त्यामुळे खात्यातील कामगिरी चांगली असूनही ते प्रवाहातून बाजूला फेकले गेले आहेत. तसेच कोणत्याही पदावर कार्यरत नाही, म्हणून त्यांचा पगारही थांबविण्यात आला. त्यामुळे त्यांच्यासमोर अर्थिक संकटे उभे राहिले आहे.

सहाय्यक पोलिस निरिक्षकांच्या पदोन्नीवरही परिणाम

पोलिस निरिक्षकांच्या उपअधीक्षक पदी पदोन्नी दिल्यानंतर पोलिस निरिक्षकांच्या जागा रिक्त होणार आहेत. त्या जागेवर सहाय्यक पोलिस निरिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहेत. परंत, पोलिस निरिक्षकांच्या पदोन्नीचा आदेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरिक्षकांचे प्रमोशनही यामुळे थांबले आहे.

टॅग्स :Policeपोलिस