शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

मिरचीचा ठसका १६० रुपये किलो!

By admin | Updated: July 14, 2016 01:26 IST

अहमदनगर : बाजार समितीच्या धोरणात राज्य सरकारने बदल केल्याचा परिणाम भाजी बाजारात तेजी होण्यात झाला आहे. भाज्यांच्या किमती अडीच पटीने वाढल्या आहेत.

अहमदनगर : बाजार समितीच्या धोरणात राज्य सरकारने बदल केल्याचा परिणाम भाजी बाजारात तेजी होण्यात झाला आहे. भाज्यांच्या किमती अडीच पटीने वाढल्या आहेत. भाजी बाजाराच्या अस्थिर धोरणाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसल्याने ग्राहकांची मनमानी लूट सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या बाजार समितीबाबत धोरणात बदल झाल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून आडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. तो बंद बुधवारी सायंकाळी मागे घेण्यात आला असला तरी चार दिवसांच्या बंदचा थेट परिणाम भाज्यांचे भाव वाढण्यात झाला. दोन-तीन दिवसातच भाज्यांच्या भावात अडीच ते तीन पट वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. बाजारात बटाट्याची आवक घटल्याने बटाटा २० रुपयावरून थेट ४० रुपयापर्यंत वाढला आहे. अद्रकच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. अद्रक ४० रुपयावरून ८० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. मिरचीच्या भावात वाढ होऊन ती ८० रुपयांवरून थेट १६० रुपये इतकी झाली आहे. लसूण १०० रुपयावरून १५० रुपयांपर्यंत, तर टोमॅटो २५ रुपयांवरून ६० रुपये झाला आहे.