शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदऱ्यात अवघा १४९ दलघफू साठा

By admin | Updated: May 31, 2016 23:08 IST

राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे.

राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, नेवासा आणि राहुरी या सहा तालुक्यांना वरदान ठरलेले भंडारदरा धरण यावर्षीही तुडुंब भरले होते. सिंचनाबरोबरच पिण्यासाठी वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या धरणातील एकूण पाणीसाठा ४४९ दलघफूटावर स्थिरावला. यातील ३०० दलघफू पाणी हा मृतसाठा आहे. त्यामुळे या धरणात यावेळी फक्त १४९ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे.गतवर्षी यावेळी या धरणात १ हजार १९९ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. धरणातून ७२० क्युसेक्सने पाणीही सोडण्यात येत होते. मागील वर्षीचाच विचार करता ७ जूनपासून धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली होती. यावर्षी धरणाच्या पाणलोटात अवकाळी पाऊसही बरसला नाही.निळवंडे धरणात यावेळी एकूण ४४६ दलघफू पाणी शिल्लक आहे. यातील १३५ दलघफू मृतसाठा आहे. म्हणजेच या धरणातही केवळ ३११ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक आहे. प्रवरेवरील दोन्ही धरणे मिळून ४६० दलघफू पाणी आजमितीस शिल्लक असून, उन्हाची तीव्रताही वाढतच असल्यामुळे आवर्तन बंद झाल्यानंतर पाच सहा दिवसात प्रवराकाठ कोरडा होत असतो. पाऊस लांबल्यास शिल्लक पाणीसाठ्यातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागास कसरत करावी लागणार, हे निश्चित. (वार्ताहर)