शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

१४०० सदस्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: August 17, 2016 00:48 IST

अहमदनगर : जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल केलेल्या ७१० ग्रामपंचायत सदस्यांचे पद प्रशासनाने कायम ठेवले असून, वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या

अहमदनगर : जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल केलेल्या ७१० ग्रामपंचायत सदस्यांचे पद प्रशासनाने कायम ठेवले असून, वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या १ हजार ३७५ सदस्यांचा निकाल जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ त्यामुळे निकाल राखीव ठेवलेल्या सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेल्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या़ जात वैधताप्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर होती़ दिलेल्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या २ हजार १४० ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यावर सुनावणी घेण्यात आली़ सुनावणीला १ हजार ८७२ सदस्यांनी हजेरी लावली़ त्यापैकी ११९ सदस्यांनी वेळेत जात वैधताप्रमाणपत्र दाखल केले़ उशिराने मिळाले पण मुदतीत सादर करणाऱ्या सदस्यांची संख्या ५९१ आहे़ जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल करणाऱ्यांची संख्या ७४० आहे़ मुदतीत प्रमाणपत्र देणाऱ्या सदस्यांचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे या सदस्यांचा जीव भांड्यात पडला़ परंतु, १ हजार ३७५ सदस्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखवित प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचा निकाल प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)