शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

१४०० सदस्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: August 17, 2016 00:48 IST

अहमदनगर : जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल केलेल्या ७१० ग्रामपंचायत सदस्यांचे पद प्रशासनाने कायम ठेवले असून, वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या

अहमदनगर : जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल केलेल्या ७१० ग्रामपंचायत सदस्यांचे पद प्रशासनाने कायम ठेवले असून, वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या १ हजार ३७५ सदस्यांचा निकाल जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ त्यामुळे निकाल राखीव ठेवलेल्या सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेल्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या़ जात वैधताप्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर होती़ दिलेल्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या २ हजार १४० ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यावर सुनावणी घेण्यात आली़ सुनावणीला १ हजार ८७२ सदस्यांनी हजेरी लावली़ त्यापैकी ११९ सदस्यांनी वेळेत जात वैधताप्रमाणपत्र दाखल केले़ उशिराने मिळाले पण मुदतीत सादर करणाऱ्या सदस्यांची संख्या ५९१ आहे़ जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल करणाऱ्यांची संख्या ७४० आहे़ मुदतीत प्रमाणपत्र देणाऱ्या सदस्यांचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे या सदस्यांचा जीव भांड्यात पडला़ परंतु, १ हजार ३७५ सदस्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखवित प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचा निकाल प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)