शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

१२०० शाळांची सोमवारी वाजणार घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:09 IST

सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर : सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत १२०९ शाळा असून त्यात सुमारे २ लाख ८४ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक व ६ हजार शिक्षकेतर कर्मचारी असा एकूण १६ हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. प्रथम सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर शाळा सॅनिटायझेशन, तसेच इतर स्वच्छता शाळांनी आपापल्या पातळीवर सुरू करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू होणार असल्याने पहिल्या दिवशी किती शाळा सुरू होणार किंवा किती विद्यार्थी शाळेत येणार हे जरी अद्याप अस्पष्ट असले तरी स्थानिक कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यायचा आहे.

तीन हजार शिक्षकांची चाचणी

एकूण १० हजार शिक्षकांपैकी तीन हजार शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून अद्याप ७ हजार शिक्षकांच्या चाचणीचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. चाचणीचा अहवाल पाहूनच मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिपायांची आवश्यकता शाळेत पहिल्या दिवशीपासून भासणार आहे. दुसरीकडे शासकीय केंद्रांवर चाचणीसाठी शिक्षकांची गर्दी होत असून कोविड सेंटरवरील नियोजन बिघडल्याचे निदर्शनास येत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी