शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

जामखेड शहरात १० दिवस कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

जामखेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, नागरिकांची बेफिकिरी यामुळे १० ते २० मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) पाळण्याचा निर्णय ...

जामखेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, नागरिकांची बेफिकिरी यामुळे १० ते २० मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) पाळण्याचा निर्णय शुक्रवारी व्यापारी, प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

शनिवार व रविवार असे दोन दिवस किराणा दुकाने ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी १० दिवसांचा किराणा खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यूसंदर्भात बैठक घेण्यात आली.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सावळेश्वर ग्रुपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख मंगेश आजबे, व्यापारी सुरेश भोसले आदी व्यापारी उपस्थित होते.

यावेळी नष्टे म्हणाल्या, शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचाही गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. सध्या आरोळे कोविड हॉस्पिटल व जम्बो हॉस्पिटलला असे ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील कोरोना आकडा दररोज ७० ते ८० च्या आसपास आहे. शहरातील २६१ रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता व उपचार घेणारे यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे १५ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले, तर कोरोना रुग्णांची संख्या घटेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी काही व्यापा-यांनी दोन दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी केली होती. परंतु, सर्वच राजकीय पदाधिकारी व काही व्यापा-यांनी १० दिवसांचे लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यामुळे प्रशासनाने १० ते २० मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

---

दूध, भाजीपाल्याची फिरून विक्री

मेडिकल, दवाखाने दिवसभर सुरू राहतील. कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांसाठी बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या वाहनांना माल उतरवून देण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याशिवाय दूध, भाजीपाला विक्री एका जागेवर न करता सकाळी ११ वाजेपर्यंत फिरून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.