शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

जामखेड शहरात १० दिवस कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

जामखेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, नागरिकांची बेफिकिरी यामुळे १० ते २० मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) पाळण्याचा निर्णय ...

जामखेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, नागरिकांची बेफिकिरी यामुळे १० ते २० मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) पाळण्याचा निर्णय शुक्रवारी व्यापारी, प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

शनिवार व रविवार असे दोन दिवस किराणा दुकाने ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी १० दिवसांचा किराणा खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यूसंदर्भात बैठक घेण्यात आली.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सावळेश्वर ग्रुपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख मंगेश आजबे, व्यापारी सुरेश भोसले आदी व्यापारी उपस्थित होते.

यावेळी नष्टे म्हणाल्या, शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचाही गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. सध्या आरोळे कोविड हॉस्पिटल व जम्बो हॉस्पिटलला असे ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील कोरोना आकडा दररोज ७० ते ८० च्या आसपास आहे. शहरातील २६१ रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता व उपचार घेणारे यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे १५ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले, तर कोरोना रुग्णांची संख्या घटेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी काही व्यापा-यांनी दोन दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी केली होती. परंतु, सर्वच राजकीय पदाधिकारी व काही व्यापा-यांनी १० दिवसांचे लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यामुळे प्रशासनाने १० ते २० मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

---

दूध, भाजीपाल्याची फिरून विक्री

मेडिकल, दवाखाने दिवसभर सुरू राहतील. कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांसाठी बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या वाहनांना माल उतरवून देण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याशिवाय दूध, भाजीपाला विक्री एका जागेवर न करता सकाळी ११ वाजेपर्यंत फिरून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.