शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 22, आपल्या गुणांबद्दलही आपल्याला अज्ञान असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:53 IST

माझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत.

ठळक मुद्देसगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत.जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे.निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो.

- सदगुरू श्री वामनराव पैमाझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तू अज्ञानी राहिलास तर प्रश्न कसे सुटणार. जीवनविद्या काय सांगते तू प्रश्नाच्या मुळाकडे जा.मुळाकडे गेलास की तुला कळेल की तिथे अज्ञान आहे.आपल्याला सगळ्याच गोष्टींचे अज्ञान आहे.विचार कसा करावा याचे अज्ञान आहे. बोलावे कसे याचे अज्ञान आहे.इच्छा आकांक्षा काय कराव्यात याचे अज्ञान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत. एखादया मनुष्याने आपल्या पोटाला धोंडा बांधलेला आहे व नदीत उतरला तर त्याचे काय होणार तर तो बुडणार अगदी तसेच आपण अज्ञानाचा धोंडा पोटाला बांधून भवनदीत उतरलेले आहोत तर मग आपले काय होणार असे असेल तर आपण बुडणार. जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टींचे अज्ञान आहे. आपल्याला मी कोण याचे अज्ञान आहे ते तर जाऊ दयाच पण आपले गुणदोष काय हे देखील आपल्याला माहित नसतात.आपल्या दोषांबद्दल आपण अज्ञानी आहोत पण आपल्या गुणांबद्दलही आपल्याकडे अज्ञान असते.आपल्यात काय काय गुण आहेत हे देखील अनेकांना माहित नसते.म्हणजे असतो गुणी पण गुणांबद्दलही अज्ञान असल्यामुळे कधीकधी असे गुण अचानक उद्भवतात.उदा.आता मी प्रवचन करतो पण शाळा कॉलेजमध्ये असताना मी कधी साधे बोललो देखील नाही.वक्तृत्व स्पर्धेत कधीच भाग घेतला नाही .कुठल्या संस्थेत जाऊन कधी मार्गदर्शन केले नाही. किंवा मी कधी लिखाण देखील केले नव्हते. पण एका प्रसंगातून माझ्या आयुष्यात प्रवचनाला सुरवात झाली. काही लोकांनी आग्रह केला की तुम्ही लिहिलेच पाहिजे म्हणून माझ्या लिखाणाला सुरवात झाली. माझी पुस्तके प्रकाशित झाली. आत्तापर्यंत अनेक प्रवचने झाली पण हे गुण देखील माझ्याकडे आहेत हे मला पूर्वी माहीत नव्हते. तसेच आपल्याकडे असलेले गुण आपल्याला माहित नसतात आणि दोषांबद्दल तर काही विचारायलाच नको. आपले दोष आपल्याला समजत नाहीत व दुस-यांनी ते दाखविलेले आपल्याला आवडत नाहीत.संत काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो. खंरतर त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत व आपण स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे.पण वास्तविक दोष दाखविल्यावर रागवणारे लोकच जास्त प्रमाणात आढळतात. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे अज्ञान किती आहे ते बघ. तुझ्याजवळ अज्ञानाचा धोंडा आहे व तू तो बांधूनच अज्ञानाच्या समुद्रात उडी घेत आहेस. त्यामुळे हे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्याठिकाणी ज्ञान आले पाहिजे. आता हे ज्ञान तुला कोण देणार. शिक्षक प्राध्यापक गुरू सदगुरु गाईड मार्गदर्शक तुला हे ज्ञान देणार. तू स्वयंभू ज्ञानी आहेस का नाही मग हे ज्ञान कुणाकडून घेण्याशिवाय तुला तरणोपाय नाही.