शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 22, आपल्या गुणांबद्दलही आपल्याला अज्ञान असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:53 IST

माझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत.

ठळक मुद्देसगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत.जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे.निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो.

- सदगुरू श्री वामनराव पैमाझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तू अज्ञानी राहिलास तर प्रश्न कसे सुटणार. जीवनविद्या काय सांगते तू प्रश्नाच्या मुळाकडे जा.मुळाकडे गेलास की तुला कळेल की तिथे अज्ञान आहे.आपल्याला सगळ्याच गोष्टींचे अज्ञान आहे.विचार कसा करावा याचे अज्ञान आहे. बोलावे कसे याचे अज्ञान आहे.इच्छा आकांक्षा काय कराव्यात याचे अज्ञान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत. एखादया मनुष्याने आपल्या पोटाला धोंडा बांधलेला आहे व नदीत उतरला तर त्याचे काय होणार तर तो बुडणार अगदी तसेच आपण अज्ञानाचा धोंडा पोटाला बांधून भवनदीत उतरलेले आहोत तर मग आपले काय होणार असे असेल तर आपण बुडणार. जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टींचे अज्ञान आहे. आपल्याला मी कोण याचे अज्ञान आहे ते तर जाऊ दयाच पण आपले गुणदोष काय हे देखील आपल्याला माहित नसतात.आपल्या दोषांबद्दल आपण अज्ञानी आहोत पण आपल्या गुणांबद्दलही आपल्याकडे अज्ञान असते.आपल्यात काय काय गुण आहेत हे देखील अनेकांना माहित नसते.म्हणजे असतो गुणी पण गुणांबद्दलही अज्ञान असल्यामुळे कधीकधी असे गुण अचानक उद्भवतात.उदा.आता मी प्रवचन करतो पण शाळा कॉलेजमध्ये असताना मी कधी साधे बोललो देखील नाही.वक्तृत्व स्पर्धेत कधीच भाग घेतला नाही .कुठल्या संस्थेत जाऊन कधी मार्गदर्शन केले नाही. किंवा मी कधी लिखाण देखील केले नव्हते. पण एका प्रसंगातून माझ्या आयुष्यात प्रवचनाला सुरवात झाली. काही लोकांनी आग्रह केला की तुम्ही लिहिलेच पाहिजे म्हणून माझ्या लिखाणाला सुरवात झाली. माझी पुस्तके प्रकाशित झाली. आत्तापर्यंत अनेक प्रवचने झाली पण हे गुण देखील माझ्याकडे आहेत हे मला पूर्वी माहीत नव्हते. तसेच आपल्याकडे असलेले गुण आपल्याला माहित नसतात आणि दोषांबद्दल तर काही विचारायलाच नको. आपले दोष आपल्याला समजत नाहीत व दुस-यांनी ते दाखविलेले आपल्याला आवडत नाहीत.संत काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो. खंरतर त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत व आपण स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे.पण वास्तविक दोष दाखविल्यावर रागवणारे लोकच जास्त प्रमाणात आढळतात. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे अज्ञान किती आहे ते बघ. तुझ्याजवळ अज्ञानाचा धोंडा आहे व तू तो बांधूनच अज्ञानाच्या समुद्रात उडी घेत आहेस. त्यामुळे हे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्याठिकाणी ज्ञान आले पाहिजे. आता हे ज्ञान तुला कोण देणार. शिक्षक प्राध्यापक गुरू सदगुरु गाईड मार्गदर्शक तुला हे ज्ञान देणार. तू स्वयंभू ज्ञानी आहेस का नाही मग हे ज्ञान कुणाकडून घेण्याशिवाय तुला तरणोपाय नाही.