शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २५, हे विश्व आपले घर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 07:00 IST

हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे

ठळक मुद्देतर प्राण्यांमध्ये युध्द लढाया झालेल्या आपण कधी ऐकल्या नाहीत.आता जर युध्द झाले तर मी जिंकलो असे सांगायला सुध्दा कुणी उरणार नाही.भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला व त्यामुळे त्याचे भस्म झाले. ही कथा जी आहे ती मोठी मार्मिक आहे.

- सदगुरू श्री वामनराव पैहे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे. कुणी कुणाला विचारत नाही, कुणाचा पायपोस कुणात नाही, एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांशी भांडतात, युध्द लढाया करतात व हे कोण करतो तर ज्या माणसाकडे बुध्दी आहे तोच हे करत असतो. इतर प्राण्यांमध्ये तुम्हाला या गोष्टी कधीच दिसणार नाहीत. इतर प्राण्यांमध्ये युध्द लढाया झालेल्या आपण कधी ऐकल्या नाहीत. दोन कुत्रे एकमेकांशी झगडतील पण एक बाजूला एका कुत्र्याची फौज व दुस-या बाजूला दुस-या कुत्र्याची फौज असे कधी होत नाही. माणसे मात्र आपला ग्रुप करतात आपली फौज तयार करतात व एकमेकांविरूध्द लढतात, संहार करतात. दुस-या महायुध्दापर्यंत किती लोक मारले गेले, किती मुले बेवारस झाली, किती बायका विधवा झाल्या आणि आता जर पुन्हा युध्द झाले तर सर्वच संपेल. आता जर युध्द झाले तर मी जिंकलो असे सांगायला सुध्दा कुणी उरणार नाही. याला कारण माणसाची बुध्दी माणसाच्या बुध्दीने जितकी प्रगती साधलेली आहे तितकीच तीने स्वत:च्या विनाशाची सुध्दा तयारी करून ठेवलेली आहे. आपल्या पुराणात एक सुंदर कथा आहे ती म्हणजे भस्मासुराची. भस्मासुराला भगवान शंकराने वर दिला. आपल्याला माहित आहे भगवान शंकर हा भोळा शंकर आहे. त्याच्याकडे जे मागावे त्याला तो तथास्तु म्हणतो.भस्मासुराने भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकराने त्याला प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले. त्यावर याने काय मागितले तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म झाले पाहिजे. म्हणजे बघा लोक काय मागतात. माणसाची बुध्दी ही अशी आहे. लोकांचे कल्याण होणारे काहितरी मागावे, लोकांचे भले होण्यासाठी काहीतरी मागावे ही बुध्दीच कोणाकडे नाही व तरीही स्वत:ला माणूस बुध्दीमान समजत असतो. असो या वरामुळे भस्मासुराने ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करायला सुरवात केली. यामुळे त्याला जे जे नको होते त्यांचे भस्म झाले. शेवटी त्याने विचार केला की आपण शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया म्हणजे आपल्याला पार्वती मिळेल. त्यामुळे शंकर धावू लागले व हा त्यांच्यामागे धावतो आहे. शेवटी विष्णुला शंकराच्या मदतीला धावावे लागले. विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले व भस्मासुराला असे नाचवले, असे नाचवले की त्याने नाचताना त्याच्या स्वत:च्याच डोक्यावर हात येईल अशी मुद्रा केली. त्यामुळे भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला व त्यामुळे त्याचे भस्म झाले. ही कथा जी आहे ती मोठी मार्मिक आहे. भस्मासुराने जसे केले ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म करीन तसे आज माणूस ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. म्हणजे दुस-याचे वाईट चिंतित आहे.