शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जग जग माझ्या जीवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 05:31 IST

मनुष्याचे जीवन ही निसर्गाने दिलेली जगातील सर्वांत अमूल्य देणगी, भेट आहे. इतर सर्व देणग्या देता-देता संपतात किंवा दिल्यानंतर देणारा ...

मनुष्याचे जीवन ही निसर्गाने दिलेली जगातील सर्वांत अमूल्य देणगी, भेट आहे. इतर सर्व देणग्या देता-देता संपतात किंवा दिल्यानंतर देणारा आणि घेणारा आपल्या कर्माने त्यांना संपवितो; पण आयुष्य हाच एक विधात्याचा प्रसाद आहे असे मानणारे आनंदयात्री बुद्ध, महावीर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, कबीर, तुकाराम आदींनी दु:खाचे कढ गिळीत आयुष्याचे गाणे सुरेल केले आणि ज्यांच्या आयुष्याच्या सतारीच्या तारा तुटलेल्या आहेत, त्यांना पुन्हा जोडून सर्वसामान्यांच्या जगण्यात सूर निर्माण करण्याचे काम केले. या साऱ्या प्रासादिक वाणीच्या प्रबोधन यात्रींना आयुष्य कधी ओझे वाटले नाही, तर जीवनाच्या वाटेवरील साºया प्रश्नचिन्हांवर मात करीत जीवन हे जगण्यासाठी आणि इतरांना जगविण्यासाठी असते हा सकारात्मक संदेश सर्व धर्मांतील सर्व सत्पुरुषांनी दिला. ज्याला आयुष्य मरणाची तमा वाटत नाही, तो मरणाला तर जिंकतोच, पण जगतानासुद्धा आयुष्याच्या वस्त्रात स्वसामर्थ्याचे धागे विणताना बहिणाबार्इंच्या शब्दांत म्हणतो -जग जग माझ्या जीवा, असं जगणं मोलाचं ।उच्च गगनासारखं, धरतीच्या रं तोलाचं ॥मानवी जीवनात स्वसामर्थ्याचा जो उदात्त हुंकार आहे, तो देवी-देवतांच्या जीवनातही नाही आणि पशू-पक्ष्यांच्या जीवनात तर मुळीच नाही. म्हणून ‘माणसाला’ केवळ ईश्वराचा प्रतिनिधीच मानले जात नाही, तर प्रत्यक्ष प्रतिसृष्टीकर्ता ईश्वरच मानले जाते. जन्माला आल्यानंतर ज्यांची सावली हरवलीय अशांची माउली होण्यात मनुष्य जन्माची जी धन्यता आहे, ती देवळाच्या दाराला सोन्याचा पत्रा मारण्यात नाही. ज्यांच्या घरात जन्मोजन्मीचा अंधार पसरलाय, त्यांच्या हातात ज्ञानाची पणती देण्यात मनुष्य जन्माची जी धन्यता आहे, ती स्वत:भोवती शिष्यांचे टोळके गोळा करून चमत्कारांच्या सुरस कथा रंगविणाºया तथाकथित गुरूबाजीत नाही. दु:खितांच्या साºया आभाळभर दु:खावर जरी मला पांघरूण नाही घालता आले, तरी त्यावर एक फुंकर मारण्यात माझ्या जन्माची सार्थकता आहे असे ज्या-ज्या मनुष्याला वाटते, त्याचे मनुष्याच्या जन्माला येणे सार्थकी लागले असे समजावे. याउलट सज्जनांच्या वाटेत काटे पसरून त्यांचे पाय रक्तबंबाळ झाल्यानंतर ज्यांचे दात दिसतात, अशी माणसे ‘अ‍ॅक्सिडेंट’ म्हणून माणसाच्या जन्माला आलेली असतात. आयुष्याचा हिशेबच जर मांडायचा असेल, तर त्यांनी आयुष्यातील मुद्दलही गमावली व व्याज गमावले असे समजावे. आपल्या खांद्यावर मानवतेची पताका घेऊन अत्यंत प्रसन्न मनाने आणि समाधानी शरीराने आयुष्याची वाटचाल करणारे असे महामानव आयुष्याच्या प्रवासातील मैलाचे दगड ठरतात, जे नेहमी आयुष्याचा प्रवास किती झाला? कसा झाला? व पुढे कसा होणार याचे मार्गदर्शन करतात. आम्ही मात्र मैलाचे दगड होण्यापेक्षा दुसºयाच्या वाटेतील दगड होतो. त्यामुळेच आम्हाला आयुष्याची खोली व गतीही कळत नाही. याउलट समाजजीवनात सात्त्विकतेचे चांदणे शिंपीत, साºया मानवजातीतच प्रसन्नतेची बीजे पेरणारे संत मात्र म्हणत राहतात -उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवडा ।बोलविले बोले बोल, धनी विठ्ठला सन्निध ।तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्यातुका म्हणे नये आम्हा, पुढे कामा गबाळ ॥त्यांच्या दृष्टीने आयुष्य नावाचे कोडे सहज भावनेने ओथंबून गेले की सहज सुटून जाते. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांच्याशी एकरूप होता-होता आयुष्याच्या झाडाला हिरवीगार पाने, फुले, फळे यावीत आणि वेळ आल्यानंतर गळून पडावीत तसे स्थूल शरीराने ते जगाचा निरोप घेतात.-प्रा. शिवाजीराव भुकेले