शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

इंद्रियांवर ताबा ठेवायचाय? मनावर विजय मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:33 IST

मनातील कल्पनांनुसार इंद्रियांना चालना

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

इंद्रिय बलवान असतात. वासनेला पूर्णत्वाला नेण्याकडे त्यांची वाटचाल असते. मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, त्यानुसार इंद्रियांना चालना मिळते. मनाप्रमाणे इंद्रिय वागतात. अपरिपक्व बुद्धी असलेल्या माणसाला विकार वश करतात. इंद्रियांच्या इच्छेनुसार मनुष्य वागला तर उंच स्थान निर्माण केलेल्या मनुष्यालाही खाली खेचतात. कारण मन अत्यंत प्रबळ आहे. प्रभावशाली असलेल्या मनावर विजय मिळवल्यास इंद्रिय ताब्यात राहातात. जो मनुष्य शांत, बुद्धिवान किंवा आत्मज्ञानी असतो, तो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो. कारण ज्ञानी मनुष्य लाभ, हानी याचा विचार करीत नाही. तो शांत चित्ताने व प्रसन्न मनाने येणाऱ्या विषयाला तोंड देतो. शांतपणे एखादा विषय हाताळतो. सुख वा दु:ख याप्रसंगी तो समान भाव ठेवतो जो मनुष्य शास्त्रविदित कर्म करतो तो अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्तहोतो. तो नेहमी प्रसन्न असतो. तो आपल्या इच्छेनुसार सर्व कर्म करतो. त्या मनुष्याला शोक-मोह बाधत नाही. तो एखादे कार्य करत असतानाही जीवन्मुक्तासारखे करतो. तो सर्व भोगूनसुद्धा त्यात आसक्ती ठेवत नाही. कारण त्याला माहिती आहे, मनच सर्व सुख-दु:खाचे कारण आहे. त्यामुळे तो निर्मलतेने जीवन जगतो.मनामुळेच माणूस बंधनात अडकतो किंवा मनामुळेच त्याला मुक्ती मिळते. जीवन जगताना सर्व कार्य मनावर अवलंबून आहे. जीवात्मा किंवा इंद्रिय जे कार्य करतात ते मनानुसारच.. मनावरच भेदभाव अवलंबून आहे. शत्रूता, मित्रता, किंवा उदासीनता ही मनाचा खेळ आहे. एकात्मता किंवा अनेकात्मता मनावर असते. विद्यावान मनुष्य सहजतेने कर्म करतो. अविद्या ही भेद उत्पन्न करते. भेद उत्पन्न झाल्याशिवाय एकरचतेचा अनुभव येत नाही. त्यामुळे मनाचा व इंद्रियांचा संबंध लक्षात ठेवा, इंद्रिय इंद्रियांचा विषयात स्वत: रममाण होतात. त्यात आत्मा निर्विकार असतो; परंतु त्याचे दोषारोपण त्या आत्मावर होते. आत्मा तर नेहमी शुद्ध आहे. आत्मा कधी बंधनात नसतो. बंधन-मोक्ष ह्या सर्व मनाच्या प्रक्रिया आहेत. मनाला शांती मनच देऊ शकते. ज्याचे मन निर्मल आहे त्याला शांती मिळते.. ज्याचे मन निरंजन किंवा निर्विकार आहे त्याचा आत्मा बंधनात अडकत नाही. म्हणजेच इंद्रियांवर त्याने पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. मन निर्मल असले की सर्व निर्मल होते. इंद्रियांवर ताबा राहातो. इंद्रियांवर ताबा मिळवला की त्याचे वैराग्य सिद्धीत जाते. मग तो नि:संदेह मुक्ती मिळवतो.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक