शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रियांवर ताबा ठेवायचाय? मनावर विजय मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:33 IST

मनातील कल्पनांनुसार इंद्रियांना चालना

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

इंद्रिय बलवान असतात. वासनेला पूर्णत्वाला नेण्याकडे त्यांची वाटचाल असते. मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, त्यानुसार इंद्रियांना चालना मिळते. मनाप्रमाणे इंद्रिय वागतात. अपरिपक्व बुद्धी असलेल्या माणसाला विकार वश करतात. इंद्रियांच्या इच्छेनुसार मनुष्य वागला तर उंच स्थान निर्माण केलेल्या मनुष्यालाही खाली खेचतात. कारण मन अत्यंत प्रबळ आहे. प्रभावशाली असलेल्या मनावर विजय मिळवल्यास इंद्रिय ताब्यात राहातात. जो मनुष्य शांत, बुद्धिवान किंवा आत्मज्ञानी असतो, तो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो. कारण ज्ञानी मनुष्य लाभ, हानी याचा विचार करीत नाही. तो शांत चित्ताने व प्रसन्न मनाने येणाऱ्या विषयाला तोंड देतो. शांतपणे एखादा विषय हाताळतो. सुख वा दु:ख याप्रसंगी तो समान भाव ठेवतो जो मनुष्य शास्त्रविदित कर्म करतो तो अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्तहोतो. तो नेहमी प्रसन्न असतो. तो आपल्या इच्छेनुसार सर्व कर्म करतो. त्या मनुष्याला शोक-मोह बाधत नाही. तो एखादे कार्य करत असतानाही जीवन्मुक्तासारखे करतो. तो सर्व भोगूनसुद्धा त्यात आसक्ती ठेवत नाही. कारण त्याला माहिती आहे, मनच सर्व सुख-दु:खाचे कारण आहे. त्यामुळे तो निर्मलतेने जीवन जगतो.मनामुळेच माणूस बंधनात अडकतो किंवा मनामुळेच त्याला मुक्ती मिळते. जीवन जगताना सर्व कार्य मनावर अवलंबून आहे. जीवात्मा किंवा इंद्रिय जे कार्य करतात ते मनानुसारच.. मनावरच भेदभाव अवलंबून आहे. शत्रूता, मित्रता, किंवा उदासीनता ही मनाचा खेळ आहे. एकात्मता किंवा अनेकात्मता मनावर असते. विद्यावान मनुष्य सहजतेने कर्म करतो. अविद्या ही भेद उत्पन्न करते. भेद उत्पन्न झाल्याशिवाय एकरचतेचा अनुभव येत नाही. त्यामुळे मनाचा व इंद्रियांचा संबंध लक्षात ठेवा, इंद्रिय इंद्रियांचा विषयात स्वत: रममाण होतात. त्यात आत्मा निर्विकार असतो; परंतु त्याचे दोषारोपण त्या आत्मावर होते. आत्मा तर नेहमी शुद्ध आहे. आत्मा कधी बंधनात नसतो. बंधन-मोक्ष ह्या सर्व मनाच्या प्रक्रिया आहेत. मनाला शांती मनच देऊ शकते. ज्याचे मन निर्मल आहे त्याला शांती मिळते.. ज्याचे मन निरंजन किंवा निर्विकार आहे त्याचा आत्मा बंधनात अडकत नाही. म्हणजेच इंद्रियांवर त्याने पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. मन निर्मल असले की सर्व निर्मल होते. इंद्रियांवर ताबा राहातो. इंद्रियांवर ताबा मिळवला की त्याचे वैराग्य सिद्धीत जाते. मग तो नि:संदेह मुक्ती मिळवतो.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक