शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

जे पेरलं ते उगवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 02:09 IST

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला.

- विजयराज बोधनकर

शेषराव आणि मुरलीधर हे दोघेही बालमित्र, एकत्रच शिक्षण पूर्ण केलं, दोघांनाही नोकऱ्या लागल्या. मागेपुढे दोघांची लग्नं झाली, संसार बहरला. काही वर्षांतच मुलांच्या शैक्षणिक जबाबदाºया पार पडल्या. मुलांची लग्नं झाली. नातवंडं झाली. दोघेही निवृत्तीचा उंबरठा ओलांडून शांतीच्या मार्गावरून चालू लागले. पण बºयाच वर्षांत शेषरावची भेट झाली नाही म्हणून मुरलीधर अस्वस्थ होते. त्यांनी बºयाच वर्षांनी शेषरावच्या घरी फोन केला तेव्हा कळले की शेषराव आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहतात. तेव्हा मात्र मुरलीधर खूप अस्वस्थ झाले. शेषरावच्या मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन जिवलग मित्राला तातडीने सपत्नीक भेटायला गेले.

अचानक मुरलीधरांना वृद्धाश्रमात पाहून शेषरावचं मन भरून आलं. इतक्या काटकसरीने जीवन जगणारा आपला मित्र अशा अवस्थेत पाहून मुरलीधर यांना खूप वाईट वाटलं. हळूहळू गप्पांच्या ओघात मुरलीधर यांच्या प्रश्नाला उत्तरे मिळत गेली. शेषराव यांनी अतिलाडाने मुलं बिघडतात अशा विचारामुळे शिस्तीचा अतिरेक केला होता. कधीही त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नव्हती. त्यामुळे शेषराव आणि मुलांमध्ये मित्रत्वाचं नातं कधीच निर्माण न झाल्याने मुलांमध्ये बापाविषयीचा ओलावा निर्माणच झाला नव्हता.

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यभर मुलांशी जेलरसारखं वागल्यानंतर मुलांकडून वृद्धापकाळात प्रेम मिळण्याची अपेक्षा शेषराव गमावून बसले होते. मुलं ओल्या मातीच्या गोळ्यासारखी. आकार देऊ तशीच ती होतात. त्यांना प्रेम दिलं ते प्रेमच देतील. पेरू तेच उगवतं. शेषराव यांच्याबाबतीत हेच झालं होतं. याउलट मुरलीधर यांनी त्यांच्या मुलांना मित्रत्वाच्या नात्याने वाढवलं होतं. त्यांची मुलं मात्र त्यांना जीवापाड जपत होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक