शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

जे पेरलं ते उगवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 02:09 IST

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला.

- विजयराज बोधनकर

शेषराव आणि मुरलीधर हे दोघेही बालमित्र, एकत्रच शिक्षण पूर्ण केलं, दोघांनाही नोकऱ्या लागल्या. मागेपुढे दोघांची लग्नं झाली, संसार बहरला. काही वर्षांतच मुलांच्या शैक्षणिक जबाबदाºया पार पडल्या. मुलांची लग्नं झाली. नातवंडं झाली. दोघेही निवृत्तीचा उंबरठा ओलांडून शांतीच्या मार्गावरून चालू लागले. पण बºयाच वर्षांत शेषरावची भेट झाली नाही म्हणून मुरलीधर अस्वस्थ होते. त्यांनी बºयाच वर्षांनी शेषरावच्या घरी फोन केला तेव्हा कळले की शेषराव आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहतात. तेव्हा मात्र मुरलीधर खूप अस्वस्थ झाले. शेषरावच्या मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन जिवलग मित्राला तातडीने सपत्नीक भेटायला गेले.

अचानक मुरलीधरांना वृद्धाश्रमात पाहून शेषरावचं मन भरून आलं. इतक्या काटकसरीने जीवन जगणारा आपला मित्र अशा अवस्थेत पाहून मुरलीधर यांना खूप वाईट वाटलं. हळूहळू गप्पांच्या ओघात मुरलीधर यांच्या प्रश्नाला उत्तरे मिळत गेली. शेषराव यांनी अतिलाडाने मुलं बिघडतात अशा विचारामुळे शिस्तीचा अतिरेक केला होता. कधीही त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नव्हती. त्यामुळे शेषराव आणि मुलांमध्ये मित्रत्वाचं नातं कधीच निर्माण न झाल्याने मुलांमध्ये बापाविषयीचा ओलावा निर्माणच झाला नव्हता.

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यभर मुलांशी जेलरसारखं वागल्यानंतर मुलांकडून वृद्धापकाळात प्रेम मिळण्याची अपेक्षा शेषराव गमावून बसले होते. मुलं ओल्या मातीच्या गोळ्यासारखी. आकार देऊ तशीच ती होतात. त्यांना प्रेम दिलं ते प्रेमच देतील. पेरू तेच उगवतं. शेषराव यांच्याबाबतीत हेच झालं होतं. याउलट मुरलीधर यांनी त्यांच्या मुलांना मित्रत्वाच्या नात्याने वाढवलं होतं. त्यांची मुलं मात्र त्यांना जीवापाड जपत होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक