शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जे पेरलं ते उगवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 02:09 IST

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला.

- विजयराज बोधनकर

शेषराव आणि मुरलीधर हे दोघेही बालमित्र, एकत्रच शिक्षण पूर्ण केलं, दोघांनाही नोकऱ्या लागल्या. मागेपुढे दोघांची लग्नं झाली, संसार बहरला. काही वर्षांतच मुलांच्या शैक्षणिक जबाबदाºया पार पडल्या. मुलांची लग्नं झाली. नातवंडं झाली. दोघेही निवृत्तीचा उंबरठा ओलांडून शांतीच्या मार्गावरून चालू लागले. पण बºयाच वर्षांत शेषरावची भेट झाली नाही म्हणून मुरलीधर अस्वस्थ होते. त्यांनी बºयाच वर्षांनी शेषरावच्या घरी फोन केला तेव्हा कळले की शेषराव आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहतात. तेव्हा मात्र मुरलीधर खूप अस्वस्थ झाले. शेषरावच्या मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन जिवलग मित्राला तातडीने सपत्नीक भेटायला गेले.

अचानक मुरलीधरांना वृद्धाश्रमात पाहून शेषरावचं मन भरून आलं. इतक्या काटकसरीने जीवन जगणारा आपला मित्र अशा अवस्थेत पाहून मुरलीधर यांना खूप वाईट वाटलं. हळूहळू गप्पांच्या ओघात मुरलीधर यांच्या प्रश्नाला उत्तरे मिळत गेली. शेषराव यांनी अतिलाडाने मुलं बिघडतात अशा विचारामुळे शिस्तीचा अतिरेक केला होता. कधीही त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नव्हती. त्यामुळे शेषराव आणि मुलांमध्ये मित्रत्वाचं नातं कधीच निर्माण न झाल्याने मुलांमध्ये बापाविषयीचा ओलावा निर्माणच झाला नव्हता.

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यभर मुलांशी जेलरसारखं वागल्यानंतर मुलांकडून वृद्धापकाळात प्रेम मिळण्याची अपेक्षा शेषराव गमावून बसले होते. मुलं ओल्या मातीच्या गोळ्यासारखी. आकार देऊ तशीच ती होतात. त्यांना प्रेम दिलं ते प्रेमच देतील. पेरू तेच उगवतं. शेषराव यांच्याबाबतीत हेच झालं होतं. याउलट मुरलीधर यांनी त्यांच्या मुलांना मित्रत्वाच्या नात्याने वाढवलं होतं. त्यांची मुलं मात्र त्यांना जीवापाड जपत होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक