शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कौजागरी पौर्णिमेची महती, मध्यरात्री करा महालक्ष्मीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:37 IST

आनंद तरंग

डॉ. रामचंद्र देखणे

शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हादकारी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा. भगवंताने गीतेत ‘नक्षणामहं शशी’ असे सांगत परमात्म्याच्या शांत तत्त्वाची आणि सौंदर्याची विभूती म्हणून चंद्राला गौरविले आहे. पौर्णिमेचा चंद्र हा तर पूर्णत्वाचा आविष्कार. प्रसन्नतेचे पूर्णत्व हीच जणू पौर्णिमा आहे. महाकवी संत, प्रज्ञावंत यांनी चंद्र आणि पौर्णिमा यांचे रूपक ठायी ठायी मांडले आहे. ज्ञानदेवांनी सद्गुरूंची प्रसन्नता चंद्राच्या रूपकातून मांडली आहे.

ज्ञानदेव म्हणतात, ‘‘अगा विश्वैकधामा। तुझा प्रसादु चंद्रमा। करू मज पूर्णिमा। स्फूर्तीची जी।।’’ ज्ञाने. १४-२३ हे विश्वैकधामा, तुझा प्रसादचंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो, आणि नवरसांचे सागर भरवीत, विवेकवल्लीची लावणी करीत माझ्याकडून या भावार्थालाही खरे पूर्णत्व लाभो. एकदा का पौर्णिमेच्या चंद्राच्या शांत, अमृतत्वाचा अनुभव घेतला की तृप्तीचेही पूर्णत्व लाभते. प्राचीन काव्यात चकोर पक्षी आपल्याला ठायी ठायी आढळतो. तो चकोर फक्त पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे पिऊनच जगतो अशी कल्पना आहे.

ज्ञानदेव पुढे म्हणतात, ‘‘सांगे कुमुदळाचेनि ताटे। जो जेविला चंद्रकिरणे चोखटे। तो चकोरू काई वाळवंटे। चुंबितु आहे।।’’ ज्ञाने. ४-१०७ ज्याने चंद्रविकासी कमळाच्या ताटात पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा आस्वाद घेतला, त्याला इतर काही खावे अशी इच्छा तरी होईल का? ही पूर्णत्वाची तृप्ती आणि तृप्तीचेही पूर्णत्व पौर्णिमेचा चंद्रच देऊ शकतो. खरे तर या पूर्णत्वाची अनुभूती आपल्याही जीवनाला लाभावी यासाठी कोजागरी पौर्णिमा आहे. त्यासाठीच या कौजागरी पौर्णिमेची योजना आहे, हे निश्चितच. पूर्णत्वाच्या अनुभूतीचा लाभ सर्वांनी घ्यावा, अशी अपेक्षा आहे. तद्वतच, अशी कल्पना आहे की कोजागरीच्या मध्यरात्री लक्ष्मी भूतलावर उतरते आणि ‘वरदा लक्ष्मी; को जागर्तीति भाषिणी।’ या संपन्नतेच्या, आनंदाच्या, वैभवाच्या पूर्णत्वासाठी कोण जागे आहे? असे विचारते. या वेळी उत्साहाने, प्रफुल्लतेने वरदा लक्ष्मी देवीचे स्वागत करणे आवश्यक असते. तसे झाले तर संपन्नता, आनंद, वैभवाची प्राप्ती होते. जागेप्रमाद, आळस झटकून कर्मजागृती व्हावी, अज्ञान संपवून ज्ञानजागृती व्हावी तर आत्यंतिक भोगवासनेला सोडून विषय जागृती व्हावी आणि जागले होऊन जागेपणे जगावे हेच खरे मानवी जीवनाचे प्रयोजन होय. 

टॅग्स :kojagariकोजागिरीAdhyatmikआध्यात्मिक