शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:49 IST

सत्संग मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो..

माणूस जसा जसा भौतिक सुखांच्या गर्तेत अडकत जातो तसे तसे त्याला अहंकार, स्वार्थ, क्रोध, मोह , माया, मत्सर यांची बाधा होते. तो मग आनंदाच्या एका एका क्षणाला परका होत दुःखाच्या खोल डोहात डुबत जातो. हे दुःखच मग मनुष्याच्या अपयशी, नैराश्यमय जीवनाचे कारण ठरते.. पण अध्यात्म, सत्संग ही दुःखावरची प्रभावी मात्रा तर आहेच शिवाय सुखाचा चिरंतन दरवळ भोवती पेरणारी अत्तरदाणी आहे. पण या सुखालाही एक दिशा ,विश्वास, आधार, प्रेरणा; अभ्यास, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी साधलेली एक 'गुरु' किल्ली हवी...नाहीतर मग माणूस सगळं काही असून देखील समुद्रात वादळात सापडलेल्या दिशाहीन जहाजासारखा भरकटत जातो.. पण ज्याला कुणाला सत्संग लाभला तो हळूहळू स्वतःला ओळखू लागतो...सत्संग मग त्याच्या मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो....पण तो सत्संग लाभण्यासाठीच गुरुकृपेची भेट घडावी लागते..त्याच गुरुतत्वाची ओळख करून देणारी असंख्य उदाहरणे आहेत..त्यापैकीच एक.. एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर. मग बोटीतून ते लगेच उतरले. पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला. थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला. कारण ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला. बाकी त्यांचे शिष्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही. मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले. गुरू म्हणाले, नरेद्र असं नाही; जे तू समजतोस. मी सर्वांना सारखाच आवाज दिला. पण तुझ्या आतील पावित्र्यामुळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला; बाकीच्यांना नाही. तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझे व माझे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठीण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो.म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक प्रत्येकजण आपल्या बरोबर कायम असतीलच असे नाही. पण आत जो बसलेला आहे तो प्रत्येकात प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे. त्याबाबतीत म्हणता येईल "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". पण आपले लक्ष बाहेर. आत आपण कधी डोकावतच नाही..

आपल्या डोक्यात नुसती नकारात्मकता, द्वेष, भरलेली आहे... सतत आपल्या मनातील संशयी वृत्ती आपल्याला अस्वस्थ करत असते.. भीतीने आपण आतून बाहेरून पूर्णतः पोखरलेलो आहोत..पण या सगळ्या कल्लोळात आपण स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहोत.. आणि जगभर परमेश्वर शोधत फिरतो आहे..पण साधू संतांनी सांगितलेली त्या विधात्याची दर्शनाची साक्षात दृष्टांत मिळवण्याची पद्धत किती सहजपणे आपण विसरलोय नाही नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत.. त्यामुळे आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे. म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते... .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक