शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:49 IST

सत्संग मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो..

माणूस जसा जसा भौतिक सुखांच्या गर्तेत अडकत जातो तसे तसे त्याला अहंकार, स्वार्थ, क्रोध, मोह , माया, मत्सर यांची बाधा होते. तो मग आनंदाच्या एका एका क्षणाला परका होत दुःखाच्या खोल डोहात डुबत जातो. हे दुःखच मग मनुष्याच्या अपयशी, नैराश्यमय जीवनाचे कारण ठरते.. पण अध्यात्म, सत्संग ही दुःखावरची प्रभावी मात्रा तर आहेच शिवाय सुखाचा चिरंतन दरवळ भोवती पेरणारी अत्तरदाणी आहे. पण या सुखालाही एक दिशा ,विश्वास, आधार, प्रेरणा; अभ्यास, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी साधलेली एक 'गुरु' किल्ली हवी...नाहीतर मग माणूस सगळं काही असून देखील समुद्रात वादळात सापडलेल्या दिशाहीन जहाजासारखा भरकटत जातो.. पण ज्याला कुणाला सत्संग लाभला तो हळूहळू स्वतःला ओळखू लागतो...सत्संग मग त्याच्या मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो....पण तो सत्संग लाभण्यासाठीच गुरुकृपेची भेट घडावी लागते..त्याच गुरुतत्वाची ओळख करून देणारी असंख्य उदाहरणे आहेत..त्यापैकीच एक.. एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर. मग बोटीतून ते लगेच उतरले. पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला. थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला. कारण ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला. बाकी त्यांचे शिष्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही. मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले. गुरू म्हणाले, नरेद्र असं नाही; जे तू समजतोस. मी सर्वांना सारखाच आवाज दिला. पण तुझ्या आतील पावित्र्यामुळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला; बाकीच्यांना नाही. तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझे व माझे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठीण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो.म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक प्रत्येकजण आपल्या बरोबर कायम असतीलच असे नाही. पण आत जो बसलेला आहे तो प्रत्येकात प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे. त्याबाबतीत म्हणता येईल "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". पण आपले लक्ष बाहेर. आत आपण कधी डोकावतच नाही..

आपल्या डोक्यात नुसती नकारात्मकता, द्वेष, भरलेली आहे... सतत आपल्या मनातील संशयी वृत्ती आपल्याला अस्वस्थ करत असते.. भीतीने आपण आतून बाहेरून पूर्णतः पोखरलेलो आहोत..पण या सगळ्या कल्लोळात आपण स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहोत.. आणि जगभर परमेश्वर शोधत फिरतो आहे..पण साधू संतांनी सांगितलेली त्या विधात्याची दर्शनाची साक्षात दृष्टांत मिळवण्याची पद्धत किती सहजपणे आपण विसरलोय नाही नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत.. त्यामुळे आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे. म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते... .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक