शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:49 IST

सत्संग मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो..

माणूस जसा जसा भौतिक सुखांच्या गर्तेत अडकत जातो तसे तसे त्याला अहंकार, स्वार्थ, क्रोध, मोह , माया, मत्सर यांची बाधा होते. तो मग आनंदाच्या एका एका क्षणाला परका होत दुःखाच्या खोल डोहात डुबत जातो. हे दुःखच मग मनुष्याच्या अपयशी, नैराश्यमय जीवनाचे कारण ठरते.. पण अध्यात्म, सत्संग ही दुःखावरची प्रभावी मात्रा तर आहेच शिवाय सुखाचा चिरंतन दरवळ भोवती पेरणारी अत्तरदाणी आहे. पण या सुखालाही एक दिशा ,विश्वास, आधार, प्रेरणा; अभ्यास, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी साधलेली एक 'गुरु' किल्ली हवी...नाहीतर मग माणूस सगळं काही असून देखील समुद्रात वादळात सापडलेल्या दिशाहीन जहाजासारखा भरकटत जातो.. पण ज्याला कुणाला सत्संग लाभला तो हळूहळू स्वतःला ओळखू लागतो...सत्संग मग त्याच्या मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो....पण तो सत्संग लाभण्यासाठीच गुरुकृपेची भेट घडावी लागते..त्याच गुरुतत्वाची ओळख करून देणारी असंख्य उदाहरणे आहेत..त्यापैकीच एक.. एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर. मग बोटीतून ते लगेच उतरले. पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला. थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला. कारण ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला. बाकी त्यांचे शिष्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही. मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले. गुरू म्हणाले, नरेद्र असं नाही; जे तू समजतोस. मी सर्वांना सारखाच आवाज दिला. पण तुझ्या आतील पावित्र्यामुळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला; बाकीच्यांना नाही. तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझे व माझे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठीण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो.म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक प्रत्येकजण आपल्या बरोबर कायम असतीलच असे नाही. पण आत जो बसलेला आहे तो प्रत्येकात प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे. त्याबाबतीत म्हणता येईल "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". पण आपले लक्ष बाहेर. आत आपण कधी डोकावतच नाही..

आपल्या डोक्यात नुसती नकारात्मकता, द्वेष, भरलेली आहे... सतत आपल्या मनातील संशयी वृत्ती आपल्याला अस्वस्थ करत असते.. भीतीने आपण आतून बाहेरून पूर्णतः पोखरलेलो आहोत..पण या सगळ्या कल्लोळात आपण स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहोत.. आणि जगभर परमेश्वर शोधत फिरतो आहे..पण साधू संतांनी सांगितलेली त्या विधात्याची दर्शनाची साक्षात दृष्टांत मिळवण्याची पद्धत किती सहजपणे आपण विसरलोय नाही नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत.. त्यामुळे आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे. म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते... .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक