शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यथा नाट्यप्रयोगस्यै:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:32 IST

देव म्हटले की पूजा आली. एक नव्हे दोन नव्हे षोडशोपचार. सोळा उपचार. प्रत्येक उपचाराला पुरुषसूक्तातील एक ऋचा म्हणायची. मंत्र आणि तंत्र दोन्ही केले पाहिजे. नैवेद्य, वस्त्र, फळे किती किती म्हणून अर्पण करायचे? महाप्रसादाचे आयोजन वेगळेच.

- डॉ. गोविंद काळे

देव म्हटले की पूजा आली. एक नव्हे दोन नव्हे षोडशोपचार. सोळा उपचार. प्रत्येक उपचाराला पुरुषसूक्तातील एक ऋचा म्हणायची. मंत्र आणि तंत्र दोन्ही केले पाहिजे. नैवेद्य, वस्त्र, फळे किती किती म्हणून अर्पण करायचे? महाप्रसादाचे आयोजन वेगळेच. समाधान मानून घ्यायचे. एखादा भाविक म्हणून जातो. आम्हाला पण सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. बघूया त्याची इच्छा केव्हा होते आहे ते. पूजा तू घालणार मग त्याची इच्छा कशाला हवी? खरेच! पूजेने देवदेवता संतुष्ट होत असतील? ही बघा नको ती शंका आली. लोक आम्हाला नास्तिक म्हणायला कमी करणार नाहीत. देव कशाने संतुष्ट होत असतील त्याचे उत्तर नाट्यवेदाची रचना करणाऱ्या भरतमुनींनी देऊन टाकले आहे.‘‘न तथा गन्धमाल्येन देवास्तुष्यन्ति पूजिता:यथा नाट्यप्रयोगस्यै: नित्य तुष्यन्ति मंगलै:’देवाच्या दारात नाटक झाले पाहिजे. देव नाट्यप्रयोगाने संतुष्ट होतात. गंधमाल्य पूजनाने नव्हे, असे भरतमुनी म्हणतात. रंगभूमीचे सुंदर तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान कळलेली जगाच्या पाठीवर एकच भूमी आहे. तिचे नाव देवभूमी गोमंतक. मंदिराचे बांधकाम सुरू झाले की समोर रंगमंडपाचे कामही सुरू होते. त्याच्याशिवाय मंदिराला पूर्णत्वच नाही. मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा होते आणि सायंकाळी त्याच्या पुढ्यात रंगमंचावर नाटक सादर होते. तोंडाला रंग फासून गावच्या देवळात नाटक केले नाही, असा गोमंतकीय विरळा. गोमंतक देववेडा पाहिला, त्याचे नाट्यवेड दुसºया क्रमांकाचे. देववेडा आहे म्हणूनच नाट्यवेडा आहे.भरतमुनींचे जन्मस्थान कोणते, यावर नव्याने संशोधन करण्यापेक्षा ‘गोमंतभूमी’ हेच भरतमुनींचे जन्मस्थान असे छातीठोकपणे किमान गोमंतकीयांनी तरी म्हणायला काय हरकत आहे? गोव्यातील देवळांची संख्या आणि त्यांच्या पुढ्यातील रंगमंचांची संख्या काढून तर बघा म्हणजे विश्वास बसेल. गोवेकरांनी सर्वत्र ईश्वर पाहिला आणि मनोभावे त्याला पूजिले ते नाट्यप्रयोग सादर करूनच. घाटावरून गाडी चालली की कंडक्टर खाली उतरून उदबत्ती लावेल, नाणं ठेवेल आणि नारळ ठेवून नमस्कार करेल. इथे कसला देव आहे रे? तो म्हणेल घाटेश्वर. एखादी पाण्याची झरी लागली की म्हणेल इथे झरेश्वर आहे म्हणून नमस्कार केला. बाबराने हिंदंूना छळले, देश लुटला असे इतिहास सांगतो. कळंगुटजवळ बाबरेश्वर नावाचा देव/मंदिर आहे. त्याचीही पूजा होते. अर्थात नाटक आलेच. साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले; पण गोव्याचे ना देववेड थांबले ना नाट्यवेड.

टॅग्स :templeमंदिर