शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

संघभावना ही यशाची गुरुकिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:08 IST

विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय...

- डॉ.दत्ता कोहिनकरएका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. त्याला विचारले, ""काय भाव आहे द्राक्षांचा...? तो म्हणाला, ""साठ रु. किलो जवळच, सुटी द्राक्षे ठेवली होती. त्याला म्हणालो, ""यांचा काय भाव आहे? तो म्हणाला, ""पंचवीस रुपये किलो पुन्हा विचारले, ""यांचा भाव साठ रुपये व यांचा भाव 25 रुपये असे का?तो म्हणाला, ""साहेब दोन्ही द्राक्षे एकाच बागेतली आहेत. दोन्ही गोड व चांगलीच आहेत; पण ही घडात - एकसंघ असल्याने साठ रुपये व ही घडातून तुटून एकेक झाल्याने 25 रुपये. मी समजून गेलो. *जोपर्यंत आपण एकसंघ आहोत, तोपर्यंत आपली किंमत उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो, तेव्हा आपली किंमत खूप खाली येते* म्हणून कुटुंबात - नातेवाइकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते. अमेरिकेत विवेकानंद आपल्या भाषणात म्हणाले, ""आज मी एकीच्या प्रेमात पडलोय. सगळी सभा अवाक झाली, विचार करू लागली अशी कोण, नशीबवान युवती आहे जिच्या प्रेमात हा राजबिंडा योगी पडला आहे? विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय, टीम होय. विवेकानंदांनीदेखील संघभावनेचे महत्त्व पटवून दिले होते. भगवान बुद्धदेखील म्हणतात "संघम्‌ शरणम्‌ गच्छामि!पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्या वेळी मराठ्यांच्या छावणीत जागोजागी चुली पेटलेल्या त्याला दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेराकडे केली, तेव्हा त्याने सांगितले, ""मराठ्यांचं सैन्य फारसं नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चूल पेटवली आहे.ह्यह्य त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, ""आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार. कारण जे सैनिक अन्न शिजवतानाही एकत्र येत नाहीत, ते राष्ट्रासाठी एकदिलाने कसे लढतील? पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात. म्हणतात ना, "व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कैशल्य असते. भगवान बुद्ध म्हणतात, "एकमेकांना समजून घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चितणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो.म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्‍यक असते. यासाठी नेता हा देखील निःस्वार्थ व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्‍न करीत नसत किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. एकता व आज्ञाधारकता एकत्र आली आणि संघभावना वाढीस लागली, की यशाची दारे उघडणे सोपे जाते.

 

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिक